मुळशी (पौड) : मुळशी तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)तर्फे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे आणि तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांच्याकडे हे निवेदन सादर केले. मुळशी तालुक्यात अनेक गावांमध्ये वणवे लागल्याने फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचीही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात तालुक्याचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत मिळेल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी मुळशी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी राम गायकवाड, तालुका संघटक हनुमंत सुर्वे, दत्ता गोरे, ॲड. धनंजय टेमघरे, काळूराम गोडांबे, प्रदीप कालेकर, दत्तात्रय देवकर, सिताराम फाले, आबा रणवरे आदी उपस्थित होते.

































