विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी घोषणा केली होती. आता रविवारी प्रसारमाध्यमांशी ब
?
समीर भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यावर टीका करताना सुहास कांदे म्हणाले, समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला होता. महायुतीच्या विरोधात ज्यांनी कामे केली, त्या सगळ्यांचीच हकालपट्टी केली जाईल, असे ठरलेले होते. भाजप, सेना, राष्ट्रवादीत असे अनेक उदाहरणे आहेत. ईडी, सीबीआय यापासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे-पुढे करत आहेत. एखाद्या प्राण्याला हुसकल्यावर कसे ते पुन्हा-पुन्हा येतात, तसे समीर भुजबळांचे उदाहरण आहेत.
समीर भुजबळ यांचा दावा काय?
रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना समोर भुजबळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मी राजीनामा दिला होता, मात्र तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना समीर भुजबळ म्हणाले, मी यापूर्वीही पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला होता, म्हणूनच मी त्यावेळी उमेदवारी केली होती. आता मला काय जबाबदारी द्यायची, हे पक्षाने ठरवावे. मुंबईतील कार्यकर्त्यांना वाटते की मी मुंबईत यावे, तर नाशिकच्या लोकांना वाटते की मी नाशिकमध्येच थांबावे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हा महायुतीकडून सुहास कांदे यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांना संधी देण्यात आली होती. यात सुहास कांदे यांनी विजय मिळवला होता, तर समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता.































