शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. याला माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते. तसेच खैरे यांनी त्यांच्या गैरहजेरीवर भाष्य करताना अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. त्य
?
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
चंद्रकांत खैरे म्हणाले, कालच्या पक्षाचा कार्यक्रम बाबत मला कुणी सांगितले नव्हते, मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचे होते. मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नव्हते, मला विचारायला हवे होते. मला डावलून कसे चालेल? आज उद्धवजी संकटात आहे. त्यामुळे एकत्र येऊन काम करावे लागेल. मात्र कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही. मी मरेल पण पक्ष सोडणार नाही. असे असताना अंबादास दानवेने मला सांगितले नाही, याबाबत मी उद्धव साहेबाना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. तो आता दोन चार महीनेच असणार आहे. शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतोय.
पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, अंबदास दानवे मला बोलतच नाही. मी माझे आंदोलन करणार, तो करेल नाही तर नाही करेल. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे कुठे जातात, कोण कसे अडजस्ट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वता: कार्यक्रमसाठी छोट्या-मोठ्यांना फोन करतो, पक्ष मोठा करायचा दिले सोडून आणि गटबाजी करताय, मी अजूनही काम करतोय. अनेक लोक सोडून चालले आहे, हे बरे नाही. आम्ही एकत्र येत मदत करायला हवी. पक्ष चालवायचा असेल तर आपण एकत्र पाहिजे. या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, या माणसाने काय केले सांगा, असा सवालही खैरे यांनी उपस्थित केला.































