Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकवैदिक धर्म, राष्ट्रधर्म आणि ‘शंखनाद महोत्सवा’चे महत्त्व !

वैदिक धर्म, राष्ट्रधर्म आणि ‘शंखनाद महोत्सवा’चे महत्त्व !

सनातन वैदिक धर्म हा भारताचा आत्मा आहे, आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचा खरा आश्रयही तोच. “यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीः स धर्मः” ही भारतीय तत्त्वज्ञानाची दिव्य व्याख्या आहे. जी जीवनाच्या दोन्ही पातळ्यांना संतुलित करते: लौकिक उन्नती आणि परमकल्याण. जगात अनेक विचारसरणी उदयास आल्या, काही प्रभावी ठरल्या, काही लयास गेल्या; परंतु मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे, हे सांगण्याची स्पष्टता केवळ सनातन धर्माकडेच आहे. म्हणूनच भारत हे केवळ भूभागाचे नाव नसून एक सर्वश्रेष्ठ संस्कृती, एक जीवन जगण्याची तेजस्वी परंपरा, अविनाशी धर्मजीवन आहे. म्हणूनच भारत एक शाश्वत आध्यात्मिक राष्ट्र आहे.

जगातील ग्रीक, रोमन, झारची रशिया ही प्रबळ साम्राज्ये वेळोवेळी उभी राहिली आणि नष्ट झाली. परंतु भारत आजही तितक्याच

सामर्थ्याने उभा आहे, कारण या राष्ट्राचे अस्तित्व राजकीय बांधणीत नसून, लोकांच्या मनातील संस्कृती, श्रद्धा, धर्मनिष्ठ मूल्ये, आणि पवित्र परंपरांमध्ये आहे. राम, कृष्ण, शिव, गाय, गंगा, मातृभूमी या सर्वांविषयीची अनुभूती आजही भारतीयांच्या चेतनेत आहे अन् हृदयामध्ये धडधडते. म्हणूनच भारत अविनाशी आहे. राष्ट्राला नष्ट करायचे अनेक प्रयत्न झाले; मात्र अवतार, संत राष्ट्रपुरुष यांनी वेळोवेळी भारताचे रक्षण केले हा इतिहास दाखवतो; आणि म्हणूनच भारताच्या धर्मजीवन, भावजीवनाचे रक्षण म्हणजे धर्मरक्षण !

आज भारत तांत्रिक, सामरिक आणि अर्थकारणात झपाट्याने पुढे जात असला, तरी दहशतवाद, नक्षलवाद, सांस्कृतिक विघातकता, अतिरेकी विचारसरणी आणि आंतरिक फूट यांसारखी अनेक आव्हाने समोर आहेत. केवळ राजकीय धोरणांनी किंवा मतांसाठी झुकणाऱ्या धर्मनिरपेक्षतेने राष्ट्र सुरक्षित राहणार नाही. राष्ट्राला जीवंत ठेवणारी शक्ती म्हणजे धर्माधिष्ठित जीवनमूल्ये, साधकता, शौर्य आणि सामाजिक बांधिलकी. म्हणूनच भारतीय राष्ट्रपुनरुत्थानाचा मार्ग सनातन धर्मातूनच जातो, हे योगी श्रीअरविंदांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून राष्ट्रचेतनेचे पुनरुज्जीवन करणारा ऐतिहासिक सोहळा आहे. १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी भारत मंडपममध्ये होणाऱ्या या महोत्सवात संरक्षण, संस्कृती, समाजजीवन, राष्ट्रीय सुरक्षा, परंपरा आणि तत्त्वज्ञान यांच्यातील संबंधांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. २५० हून अधिक विविध प्रकारची शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी, पारंपरिक युद्धकलेचे प्रात्यक्षिक, विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संत-महंतांची प्रेरणा आणि ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयावरचे सखोल सत्र, हे सर्व राष्ट्राला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

महाभारतात श्रीकृष्णांनी जसा धर्मयुद्धासाठी शंखनाद केला, तसा आजचा हा महोत्सवही भारताला धर्माधिष्ठित, सुरक्षित आणि जागृत राष्ट्राकडे नेणारा नवा शंखनाद आहे. प्रत्येक सनातन धर्मीयांनी हा संदेश आत्मसात करून कृतीत उतरवला, तर हा महोत्सव नवयुगाची, रामराज्याची सुरुवात ठरेल.

– श्री. दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक तथा व्याख्याते

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!