Homeदेश-विदेशIT प्रोफेशनल्स 17 वर्षे विश्रांतीशिवाय काम करत आहेत आणि नंतर काढून टाकले...

IT प्रोफेशनल्स 17 वर्षे विश्रांतीशिवाय काम करत आहेत आणि नंतर काढून टाकले पोस्ट व्हायरल मराठी बातम्या


आयटी प्रोफेशनल्स व्हायरल पोस्ट: कंपनीसाठी आपण दिवस रात्र एक करुन काम करत असतो. 8 तासाची शिफ्ट संपली तरी अनेक जण काम करतच असतात. काहीजण तर पगारवाढ नाही मिळाली तरी वर्षानुवर्षे एकाच कंपनीत असतात. इतकं प्रामाणिक राहुनही कंपनीने तुम्हाला अचानक कामावरुन काढून टाकलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असाच धक्कादायक प्रकार एका आयटी इंजिनीअरसोबत घडला. यासंदर्भात त्याने एक पोस्ट लिहिनी असून ती सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतेय. ती वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अमेझॉन कंपनीतील एका आयटी इंजिनीअरने 17 वर्षे अविरत मेहनत केली, एकही सुट्टी न घेता कुटुंबासाठी संघर्ष केला. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रोजेक्टवर भर देण्याच्या धोरणामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणावर कपात सुरू केली. याचा फटका इंजिनीअरला बसला आणि त्याला नोकरी गमवावी लागली. ज्यामुळे त्याचे जीवन एका क्षणात उलटले. या घटनेने आयटी क्षेत्रातील नोकरीच्या असुरक्षितता समोर आली.

भावनिक पत्र

प्लॅटफॉर्म ब्लाइंडवर त्याने आपली व्यथा मांडली. ’17 वर्षे मी कधी ब्रेक नाही घेतला, कुटुंबासाठी झटलो, पण आता रडू आलंय.’, असं त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. कपातीची वृत्त कळताच तो एक तास रडत बसला होता. नंतर पत्नीला कॅफेत बोलावून त्याने सर्व घटना सांगितली. पत्नीने त्याला धीर दिला, ‘ आपण मिळून यातून पुढे जाऊ.’, असे ती म्हणाली.

हे पत्र लाटून हजारो लोकांचे डोळे पाणावले. ज्यात अनेकांनी स्वत:ला त्याच्या अनुभवांशी जोडले. ही केवळ वैयक्तिक कहाणी नाही तर एआय क्रांतीमुळे लाखो आयटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी निगडित वेदनादायी सत्यकथा असल्याचे म्हटले जात आहे.

कुटुंबाच्या साथीने नवी सुरुवात

कपातीच्या दुसऱ्या दिवशी आयटी इंजिनीअर पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी गेला. त्याने मुलांना शाळेत सोडले. मुलांच्या हास्याने त्याला जाणवले, ‘खरे जगणे म्हणजे हे.’ यापूर्वी कामामुळे थकलेला असल्याने कुटुंबासाठी वेळ मिळाला नव्हता. आता मात्र त्याला यात आनंद दिसू लागलाय. ‘स्वतःला दोष देऊ नका, हा शेवट नाही, नव्याची सुरुवात आहे.’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सोशल मीडियात प्रतिक्रिया

पत्र व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आलाय. एका यूजरने म्हटले, ‘राहणीमान साधे ठेवा, नोकरीला आयुष्याशी वरचढ होऊ देऊ नका.’ दुसऱ्याने सांगितले, ‘कपात ही संधी आहे, स्वतःला पुन्हा शोधण्याची.’ तिसऱ्याने म्हटले, ‘अनेक मेहनती कर्मचारी कुटुंबाकडे वेळ देतात, आता तुम्हीही ते करा.’ या प्रतिक्रियांमुळे इंजिनीअरला आधार मिळाला.तसेट आयटी क्षेत्रातील असंख्य लोकांना धीर मिळालाय. आता तो नव्या संधी शोधतोय, ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली आहे.

एआयमुळे आयटी क्षेत्रात नोकऱ्यांवर संकट

एआय तंत्रज्ञानाने आयटी क्षेत्रातील लाखो नोकऱ्या धोक्यात आणल्या आहेत. अमेझॉनसारख्या कंपन्या एआयवर गुंतवणूक वाढवत असल्याने कपात वाढलीय. करिअरसोबत वैयक्तिक जीवनाची किंमत समजून घ्यावी लागेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. १७ वर्षे काम केलेल्या आयटी कर्मचाऱ्याला कशामुळे नोकरी गमावली?

अमेझॉन कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रकल्पांवर भर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छंटणी केली. या कर्मचाऱ्याला ईमेलद्वारे अचानक नोकरीतून काढल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे त्याचे १७ वर्षांचे समर्पण एका क्षणात संपले.

२. कर्मचाऱ्याच्या भावनिक पत्रात काय म्हटले आहे?

ब्लाइंड प्लॅटफॉर्मवर त्याने लिहिले: ‘१७ वर्षे सुट्टीशिवाय काम केले, कुटुंबासाठी झालो, पण आता रडू आले.’ छंटणी कळताच तो एक तास रडला, पत्नीला कॅफेत बोलावून सांगितले. पत्नीने धीर दिला की, ‘मिळून हे संकट पार करू.’

३. कपातीनंतर कर्मचाऱ्याने काय शिकवले?

तो म्हणाला, ‘स्वतःला दोष देऊ नका, हे अंत नाही, नव्या सुरुवातीची सुरुवात आहे.’ कुटुंबासोबत वेळ घालवण्याची महत्त्वाची जाणीव झाली. सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया आल्या, ज्यात इतरांनीही आपल्या अनुभव शेअर केले आणि त्याला आधार दिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!