Homeदेश-विदेशNashik's national archer Arjun dies after falling from train at Kota station,...

Nashik’s national archer Arjun dies after falling from train at Kota station, slips and gets stuck in platform while getting off to get food packet | नाशिकचा राष्ट्रीय तिरंदाज अर्जुनचा कोटा स्थानकावर रेल्वेतून पडून मृत्यू: जेवणाचे पॅकेट घेण्यासाठी उतरताना घसरून प्लॅटफॉर्ममध्ये अडकला – Nashik News

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणेचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. तो सहकाऱ्यांसह भटिंडाहून शकुरबस्ती- मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता. कोटा रेल्वे स्थानकावर जेवणाचे पॅके

.

२० वर्षीय अर्जुन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी भटिंडा येथे गेला होता. ते तिथून परतत होते. शनिवारी रात्री ८:३० वाजता कोटा जंक्शनवर आल्यानंतर ही अपघाताची दुर्देवी घटना घडली. अपघातानंतर त्याचे साथीदार घाबरले. असा अपघात होऊ शकतो याची कोणालाही कल्पना नव्हती. त्याला ताबडतोब एमबीएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. रविवारी त्याचे मामा आणि मावशीचा मुलगा कोटा येथे पोहचले. शवविच्छेदनानंतर, मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

भाऊबीजेला नव्हता घरी

मागील दहा दिवसांपासून अर्जुन हा गुरु काशी विद्यापीठ पंजाब येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेसाठी त्याची चुलत बहीण दीक्षासोबत गेला होता.

गेल्यावर्षी लिगामेंट शस्त्रक्रिया, तेथेच अपघातात दुखापत

अर्जुनचे गेल्या वर्षी उजव्या पायाचे लिगामेंटचे ऑपरेशन झाले होते. परंतु, दुर्दैवाने या अपघातात त्याच पायाला दुखापत झाली

आठ सुवर्णपदके नावावर, चाैघे भाऊ-बहीण तिरंदाज

अर्जुन पदवीचे शिक्षण घेत होता. पाच वर्षांपासून चौघे बहिण- भाऊ तिरंदाजीचा सराव करत होते. तो आठ वेळा राष्ट्रीय पातळीवर खेळला आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ वेळा सुवर्णपदके जिंकली होती.

अपघाताच्या १५ मिनिटांपूर्वी वडिलांशी फोनवर बोलणे

खेडगाव | अपघाताआधी १५ मिनिटांपूर्वी अर्जुनचे वडिलांशी फोनवर बोलणे झाले होते. तो वडिलांशी बोलताना म्हणाला, की पप्पा आम्ही आताच जेवण केले आहे. दहा मिनिटांत ट्रेन निघणार आहे. आम्ही उद्या सायंकाळी पाचपर्यंत घरी पोहोचू. त्यानंतर पंधरा मिनिटांनी त्याचा परत फोन आला की पप्पा, माझा अपघात झाला. पायाला लागले. वडिलांनी सांगितले की, घाबरू नकोस सगळे व्यवस्थित होईल. त्यानंतर तो बोलला की सरांशी बोला. सरांनी त्याच्या वडिलांना सांगितले की, त्याला हॉस्पिटलला हलवत आहोत.

स्पर्धेत चांगली कामगिरी, अपघाताने धक्का

अर्जुन एक चांगला खेळाडू होता. तो कसा पडला हे स्पष्ट नाही. अर्जुनने भटिंडा येथील आंतर-विद्यापीठ स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. -अनिल कमलापुरी, प्रशिक्षक



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!