Homeदेश-विदेशसर्वोच्च न्यायालयात वकिलांनी जोडीच्या हल्ल्यावरील सीजेआय बीआर गावाई प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी जोडीच्या हल्ल्यावरील सीजेआय बीआर गावाई प्रतिक्रिया


जोडीच्या हल्ल्यावर सीजेआय गावाई: सुप्रीम कोर्टात वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फिरकावत हल्ला केल्याचा प्रयत्न केल्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) या घटनेची दखल घेत, संताप व्यक्त केला होता. सरन्यायाधीश बी आर गवई (BR Gawai) यांनी मात्र याप्रकरणी संयम दाखवत कोणतीही तक्रार न दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दिल्ली पोलिसांनी वकिल राकेश किशोर यांची सुटका केली होती. दरम्यान आता सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी या घटनेवर मौन सोडत भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बूट हल्ल्यामुळे आपल्याला खूप धक्का बसला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण आता ही घटना विसरलो आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

सरन्यायाधीशांनी सांगितले की, त्या दिवशी घडलेल्या घटनेने त्यांना आणि त्यांच्या खंडपीठावरील सहकारी न्यायाधीशांना खूप धक्का बसला होता, परंतु आता तो आपल्यासाठी विसरलेला अध्याय आहे. कोर्टरूममध्ये एका वकिलाशी बोलताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली. वकील गोपाल शंकर नारायणन म्हणाले, “मी या घटनेवर एक लेख लिहिला आहे. 10 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातही अशीच एक घटना घडली होती, परंतु त्यानंतर न्यायाधीशांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांच्या अवमानाच्या अधिकारांचा वापर केला”.
त्या खंडपीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी बुटाच्या हल्ल्यावर कडक भूमिका घेतली होते. ते म्हणाले, “या प्रकरणावर माझं वेगळं मत आहे. ते सरन्यायाधीश आहेत. ही विनोदाची बाब नाही. मला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही; हा संस्थेचा अपमान आहे.”

राकेश किशोर म्हणाले की जेव्हा सरन्यायाधीशांसमोर मूर्तीच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही देवाचे खूप मोठे भक्त आहात. तुम्ही जाऊन मूर्तीला काहीतरी करायला सांगावे, स्वतःची दुरुस्ती करायला सांगावी.” मला ही टिप्पणी आवडली नाही. मला आणखी दुःख तेव्हा झालं, जेल्हा सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावली.

दुसऱ्या दिवशी या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलं. हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न होता. आम्हीही यावर सहमत झालो, पण नंतर तीन दिवसांपूर्वी त्यांनी मॉरिशसमध्ये म्हटले होतं की, बुलडोझरने देश चालवता येत नाही. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बुलडोझर कुठे आणि का वापरले जात आहेत.

आता वकिलीही करता येणार नाही

दरम्यान, सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांना पोलिसांनी घटनेनंतर ताब्यात घेऊन सोडून दिलं. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी वकिलाला सोडून दिलं आहे. वकीलाचं आधार कार्ड, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे कार्ड आणि मोबाईल फोन देखील पोलिसांनी परत केला आहे. सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांचं लायसन्स बार कौन्सिल ऑफ इंडियाने रद्द केलं आहे. त्यामुळे राकेश किशोर यांना यापुढे वकिली करता येणार नाही.

FAQ

1) मुख्य न्यायमूर्तीवर शू फेकण्याची घटना काय आहे?’
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर १ मध्ये, एका वकीलाने मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्याकडे शू फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान घडली आणि ती धार्मिक विवादाशी संबंधित होती.

2) मुख्य न्यायमूर्ती गवई यांची प्रतिक्रिया काय होती?
‘मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी सांगितले की, ही घटना आम्हाला धक्का देणारी होती, परंतु आता ती विसरलेला अध्याय आहे. ते म्हणाले की, न्यायालयासाठी ही गोष्ट संपली आहे.

3) या घटनेचे कारण काय होते?
वकीलाने मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्या हिंदू देवाबाबत केलेल्या टिप्पणींवरून निषेध म्हणून हा प्रयत्न केला. ही टिप्पणी संतान धर्माशी संबंधित असल्याचा दावा आहे, ज्यामुळे धार्मिक विवाद निर्माण झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

प्रवीण दरेकरांचा विरोधकांना टोला:अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना लगेच राजीनामा मागणे योग्य नाही

0
मुंबईतील मुसळधार पाऊस, पाणी तुंबणे, प्रशासनावरील टीका आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट भूमिका...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...

यूएस 250 व्या स्वातंत्र्य वर्धापनदिनानिमित्त 408 किलो टाइम कॅप्सूल पुरणार ​​आहे, 2276 मध्ये उघडेल

0
वॉशिंग्टन डीसी9 तासांपूर्वीलिंक कॉपी करा4 जुलै रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 408 किलो वजनाचा एक टाइम कॅप्सूल जमिनीखाली दफन केला जाईल....
spot_img

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...

इथेनॉल विरोधावर सरकार म्हणाले-:ही तपासलेली वैज्ञानिक प्रक्रिया; जागतिक पद्धतीने पेट्रोलमध्ये मिश्रण, टॉप एजन्सींनीही टेस्ट...

0
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून सुरू असलेल्या विरोधादरम्यान, शनिवारी सरकारने सांगितले की इथेनॉल मिश्रणाचे (ब्लेंडिंगचे) काम रातोरात झालेले नाही. ही एक तपासलेली, वैज्ञानिक आणि टप्प्याटप्प्याने...

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...
error: Content is protected !!