Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी यूके भेट द्या आणि ब्रिटनने ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार...

पंतप्रधान मोदी यूके भेट द्या आणि ब्रिटनने ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराचे अंतिम रूप दिले. महाराष्ट्रावर काय परिणाम होईल


पंतप्रधान मोदी यूके भेट महाराष्ट्रावर परिणाम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भातील माहिती समोर आली असून, त्याच्याशी थेट महाराष्ट्राचंही नातं जोडलं जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी मुलाखतीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये कैक मुद्द्यांवर चर्चा झाली. जिथं या दोन्ही नेत्यांनी भारत- ब्रिटनदरम्यान (युके) मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर एकमतानं पुढाकार घेतला. सोबतच दहशतवाद, कट्टरतावादाविरोधादत कठोर भूमिका घेण्याचाही संकल्प केला.

का चर्चेत आहे PM Modi यांची ब्रिटनभेट?

जवळपास मागील तीन वर्षांपासून ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली आणि अखेर बहुप्रतिक्षित चर्चा आणि वाटाघाटींनंतर या दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करार’ अस्तित्वात आल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत पीयुष गोयल यांनी भारताच्या वतीनं आणि जोनाथन रेनॉल्ड यांनी ब्रिटनच्या वतीनं या जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या करारावर स्वाक्षरी केली.

सोप्या शब्दात समजून घ्या या कराराचा कोणाला फायदा?

ब्रिटन आणि भारतादरम्यान झालेल्या या करारामुळं अनेक भारतीय उत्पादनांना ब्रिटनच्या बाजारपेठेत करमुक्त प्रवेश करणं शक्य होईल आणि ब्रिटनमधून भारतात येणारी चारचाकी वाहनं ते अगदी मद्यसुद्धा स्वस्त होईल. Economic and Trade Agreement अशा नावानं संबोधल्या जाणाऱ्या या करारामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार असून, भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांनध्ये एका नव्या इतिहासाची ही नांदी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि महाराष्ट्राशी असणारं नातं…

– भारतातून होणाऱ्या 99 टक्के निर्यातीला ब्रिटनमध्ये 100 टक्के व्यापार कर सवलत.

– भारतातून पादत्राणांचे प्रकार, वस्त्रोद्योग, हिरे, दागिने, मत्स्योत्पादन आदि वस्तूंना ब्रिटनच्या मोठ्या बाजारपेठेत वाव मिळणार.

– दुहेरी योगदान पद्धती अर्थात दोन्ही देशांचं समान आणि भरीव योगदान असल्यामुळं ब्रिटनसह भारतातील सेवा क्षेत्राला नवी उभारी मिळणार.

– भारतीय नोकरदारांना ब्रिटनमध्ये नोकरीच्या संधी

– ब्रिटनमधील जवळपासल 75 हजार भारतीयांना ‘सामाजिक सुरक्षा शुल्का’तून तीन वर्षांसाठी सूट

– आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फायदा

– महाराष्ट्रातील कोकणचा हापूस आंबा बागायतदार, फणस उत्पादकांना फायदा

– नाशिकच्या द्राक्ष आणि कांदा उत्पादकांना फायदा

– कोल्हापूरी चप्पल कारागिरांनासुद्धा फायदा होणार, सोबतच राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगालाही या करारामुळं फायदा होणार असून, एका अर्थी ही महाराष्ट्राला लागलेली लॉटरी आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!