Homeमनोरंजनअजित पवार प्लेन क्रॅश नाना पाटेकर चांगल्या मित्राच्या निधनावर काय म्हणाले होते...

अजित पवार प्लेन क्रॅश नाना पाटेकर चांगल्या मित्राच्या निधनावर काय म्हणाले होते विमान अपघाताच्या कटातील कट


अजित पवार विमान अपघात: जानेवारी 2026 ची 28 तारीख ही महाराष्ट्रासाठी दु:खाचीच बातमी घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त वाऱ्याच्या वेगानं पसरलं आणि पवार कुटुंबावर एक मोठा आघात झाला. परिस्थिती अतिशय आव्हानाची असतानाही पुन्हा एकदा सारं बळ एकवटून या कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं जीवनाचा गाडा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला, किंबहुना हे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. मात्र कुटुंबापुढं असणारं दु:ख अतिशय मोठं असून यावेळी आपण या कुटुंबाच्या सोबत आहोत अशीच भावना राज्यातील जनतेची आणि नाना पाटेकरांचीसुद्धा आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नुकतंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी अजित पवार यांचं अपघाती निधन आणि त्यानंतरची एकंदर परिस्थिती यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘त्यांना भेटल्यानंतर एकच गोष्ट आहे की त्यांचं दु:ख आपल्याला वाटून घेता येणार नाही. आम्हालाही दु:ख झालं आहे. पण, त्यांचं जे दु:ख आहे ते डोंगराइतकं मोठं आहे आणि ते त्यांना सहन करावं लागेल. कारण, त्यांनी जो पदभार स्वीकारला आहे त्याचीही काही जबाबदारी असून ती निभावण्यासाठी त्या बांधिल आहेत आणि त्या निभावतील. वेळ तर जाईलच…’, नाना म्हणाले.

रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर आणि त्याच्या अपघाती निधनावर प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भातील प्रश्नावरही नाना पाटेकर यांनी वक्तव्य केलं. ‘रोहित पवार यांचे ते काका होते, ते त्यांच्या कुटुंबातील आहेत, त्यांनी कुटुंबातील सदस्य म्हणून मनातील शंका ते बोलले असतील. मी ती ऐकली नसल्यानं त्यावर थेट प्रतिक्रिया देणार नाही. मात्र जर असं झालं असेल (घातपात) तर ते सिद्ध होईल सिद्ध झालं तर तर ज्यांनी हा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा होईल’, असं ठाम मत त्यांनी मांडलं.

दरम्यान, दोन्ही एनसीपी विलीनीकरणाबाबतच्या प्रश्नावरही उत्तर देत निर्णय त्या दोन्ही पक्षांवर असेल, हे मला ठरवता आलं असतं तर मीच ठरवलं असतं, असं म्हणत अजित पवार आणि आपल्या मैत्रीचं नातंही त्यांनी माध्यमांसमोर आणलं. आपण अजित पवार हे 19-20 वर्षांचे असल्यापासून त्यांना ओळखतोय. त्यांनी कार्यकर्त्याच्या रुपात काम सुरू केलं तेव्हापासून त्यांना ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘आता कोणीही व्यक्ती मोठा झाला तर आमची अशी मैत्री होती वगैरे बोलण्याची पद्धत आहे. पण, आज ती व्यक्तीच नाही, तर त्यांच्याविषयी बोलून उपयोग काय? मात्र त्यांची या क्षेत्रात जशी सुरुवात झाली होती आणि ते ज्या पद्धतीनं या पदापर्यंत पोहोचले हा प्रवासच कमाल होता. राजकीय गोष्टी सोडा मात्र, ते मला कायमच स्मरणात राहतील. मी एक सच्चा दोस्त गमावला आहे. माझ्या धाकट्य़ा भावासारखे होते’, असं सांगताना अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्यांची उत्तरं, शंकांचं निरसन झालंच पाहिजे आणि प्रश्न उपस्थित होतायत तर उत्तरही मिळतील याचाच पुनरुच्चार नाना पाटेकर यांनी केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!