Homeमहाराष्ट्रराममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विश्वस्तांवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्यात यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत देशभरातील लाखो भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. यावेळी भक्तांनी मंदिरातील तब्बल ३५ दानपेट्यांमध्ये श्रद्धेने कोट्यवधी रुपयांचे दान जमा केले. या देणग्यांचे योग्य नियोजन आणि विनिमय करण्याची जबाबदारी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विश्वस्तांची होती. मात्र, विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या देणग्यांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा गैरव्यवहार म्हणजे केवळ एखाद्या संस्थेतील प्रशासकीय त्रुटी नसून, तो देणगी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची झालेली फसवणूक आहे, असे ॲड. सिंग यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘हा तर राष्ट्रविरोधी गुन्हा’; कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने या प्रकरणाचे गांभीर्य विषद करताना म्हटले आहे की, देणग्यांचा अपहार हा केवळ एक आर्थिक गुन्हा नाही, तर तो समाजाविरुद्ध आणि राष्ट्राविरुद्ध केलेला अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची तातडीने आणि निष्पक्षपातीपणे चौकशी सुरू करावी. दोषी विश्वस्तांना अटक करून त्यांना पोलीस कोठडी द्यावी आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह दोषी विश्वस्तांना अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने कल्याणमध्ये लक्षवेधी आंदोलन केले. ॲड. नवीन सिंग यांच्या पुढाकाराने महात्मा फुले पोलीस ठाण्याबाहेर ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ करण्यात आला. विशेष म्हणजे, हे निवेदन देताना राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वेशातील प्रतीकात्मक कलाकारांना सोबत ठेवण्यात आले होते. या निवेदनावर कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन देताना साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने उपस्थित होते. आता पोलीस या निवेदनावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… शेरनी अगर शांत है, तो डकारणा नहीं भूलती:नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभीमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचे मत व्यक्त लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही मोठा दावा केला आहे. सविस्तर वाचा… वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!