हैदराबाद बंगलुरु बसने पेट घेतला आहे. आज सकाळी हरिका ज्या व्होल्वो बसमध्ये प्रवास करत होती त्या बसला आग लागली तेव्हा ती झोपली होती. गोंधळामुळे तिला धक्का बसला आणि ती उठली तेव्हा तिला दिसले की आगीने गाडी जवळजवळ वेढली होती. बसच्या मागच्या बाहेर पडण्याचा दरवाजा तुटला होता म्हणून तिचा जीव बचावल्याच ती सांगते. हरिका बाहेर उडी मारण्यात यशस्वी झाली. बसचं राखेत रुपांतर होण्यापूर्वी ती जखमी होऊन या भयानक आगीतून वाचली, त्यात 20 जणांचा मृत्यू झाला.
हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या 40 प्रवाशांपैकी हरिका एक होती ती सांगते की, ही घटना पहाटे ३-३:३० च्या सुमारास घडली असावी. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील उलिंडाकोंडाजवळ राष्ट्रीय महामार्ग 44 वर दुचाकीला धडकल्याने व्होल्वो बसला आग लागली.
आग लागली तेव्हा बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते आणि आगीनंतर बाहेर पडणे कठीण झाले. हरिकाला जाग येईपर्यंत आगीच्या ज्वाळा काही सेकंदातच बसमध्ये पसरल्या होत्या. “मागील दरवाजा तुटलेला होता, म्हणून मी तिथून उडी मारली. उडी मारताना मला दुखापत झाली,” असं हरिका म्हणते.
(हे पण वाचा – अपघातात बचाव करायचा असेल तर कार, बस, ट्रेन आणि फ्लाइटच्या ‘या’ सीटवर बसा, लक्षात ठेवा या सोप्या गोष्टी)
लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या या स्लीपर व्होल्वो बसमध्ये स्लीपर सीट्ससाठी पडदे असतात जेणेकरून त्यांची गोपनीयता टिकेल. त्यामुळे बसमधून पळून जाणाऱ्या प्रवाशांना इतर सीट्स भरल्या आहेत की नाही हे शोधणे कठीण झाले. “ही स्लीपर असल्याने, आम्ही फक्त चढतो आणि झोपतो. पडद्यांमुळे तिथे किती लोक आहेत किंवा कोण आहे हे आम्हाला माहित नाही,” हरिका म्हणतात.
दुसऱ्या एका वाचलेल्या प्रवाशी सूर्याच्या मते, आग कदाचित पहाटे २:४५ च्या सुमारास लागली असावी. “एक बाईक आली आणि काहीतरी घडले. आम्हाला काहीच स्पष्ट कळले नाही. पण बाईक बसखाली गेली आणि ठिणग्या येऊ लागल्या आणि नंतर आग लागली. सर्वांनी ते पाहिले, ज्यांना खाली उतरणे जमले ते खाली उतरले,” तो म्हणतो.
कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चालक आणि मदतनीस वगळता सुमारे 40 प्रवासी होते. आगीची माहिती मिळताच, खिडक्या तोडून सुमारे 20 जणांनी बाहेर उड्या मारल्या. 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. चालक पळून गेला असावा. फॉरेन्सिक टीम बसमध्ये कोणाला तरी सोडून गेले असेल याचा शोध घेत आहे.
काही मृतदेह पूर्णपणे जळाले होते आणि त्यांची ओळख पटणे अशक्य होते, असे टीडीपी खासदार बायरेड्डी शबरी यांनी सांगितले. आंध्र प्रदेश वाहतूक अधिकारी आता बसची स्थिती तपासत आहेत.































