मराठी मधील ट्रेंडिंग बातम्या: उत्तर प्रदेशच्या जौनपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक 75 वर्षांच्या वृद्धाने 35 वर्षांच्या महिलेसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर मधुचंद्रानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर गावातदेखील एकच चर्चा रंगली आहे. गौरा बादशाहपुर ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण असून गावाचे नाव कुछमुछ असं आहे.
संगरु राम नावाच्या व्यक्तीच्या पत्नीचे निधन एक वर्षापूर्वी झाले होते. संगरु राम यांना मुलं नव्हती. ते एकटचे राहायचे. शेती करुन ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते. तर, त्यांचे भाऊ आणि त्यांची मुलं दिल्लीत वास्तव्यास होती. तिथे त्यांचा व्यवसाय आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगरु राम हे गेल्या काही दिवसांपासून दुसरं लग्न करण्याबाबत बोलत होते. मात्र गावातील लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वय जास्त झाल्यामुळं त्यांनी लग्न करु नये असा सल्ला दिला. मात्र तरीही ते ऐकले नाहीत. सोमवारी त्यांनी जलालपूर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय मनभावती हिच्याशी कोर्ट मॅरेज केले. तसंच, मंदिरातही लग्न केले.
मनभावती हिचेदेखील हे दुसरं लग्न होते. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि एक मुलगा आहे. मनभावतीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या आधी संगरूने तिला म्हटलं होतं की तु फक्त माझं घर सांभाळ, मी तुझ्या मुलांची जबाबदारी घेतो. लग्नानंतर आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो होतो. सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. संगरू रामचे भाचे यांनीमात्र संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा करत अत्यंसंस्कार थांबवलण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस या भूमिका घेतात आणि संगरू राम यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार का? असा सवाल सध्या गावात उपस्थित होत आहेत. संगरू यांचा मृत्यू नेमका कशा मुळं झाला हे मात्र अद्याप समोर आले नाहीये. त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
FAQ
प्रश्न १: ही धक्कादायक घटना कुठे घडली?
उत्तर: ही घटना उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील गौरा बादशाहपुर ठाणे क्षेत्रातील कुछमुछ गावात घडली आहे.
प्रश्न २: संगरु राम कोण होते आणि त्यांची पार्श्वभूमी काय?
उत्तर: संगरु राम हे ७५ वर्षांचे वृद्ध होते. त्यांची पत्नी एक वर्षापूर्वी निधन पावली होती. त्यांना मुलं नव्हती आणि ते एकटे राहत होते. शेती करून उदरनिर्वाह चालवत होते. त्यांचे भाऊ आणि भाचे दिल्लीत व्यवसाय करत राहतात.
प्रश्न ३: महिलेचे नाव आणि तिची पार्श्वभूमी काय?
उत्तर: महिलेचे नाव मनभावती आहे आणि ती ३५ वर्षांची आहे. तिचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नातून तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ती जलालपूर येथे राहते.































