Homeमनोरंजनरिपोर्ट सूचित करतो की विराट कोहलीने स्वातंत्र्याच्या कमतरतेमुळे कसोटीपासून दूर केले आहे,...

रिपोर्ट सूचित करतो की विराट कोहलीने स्वातंत्र्याच्या कमतरतेमुळे कसोटीपासून दूर केले आहे, अजित आगरकर यांच्याशी दोनदा चर्चा केली होती


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून अचानक निवत्ती जाहीर करत फक्त भारतच नाही तर जगभराती क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. विराट कोहलीच्या निर्णयाने काहींच्या भुवया उंचावल्या असताना, अनेकांनी विराटने फार आधीच यासंबंधी निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचं चक्र सुरु होत असताना, विराटला जर संघाला पात्र व्हायचं असेल तर त्याला आणि संघाला काही गोष्टी करण्याची गरज असल्याची जाणीव होती. दरम्यान रिपोर्टनुसार, विराट कोहलीला एक नवं आव्हान हवं होतं. बदल होत असताना आपल्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपद दिलं जावं अशी त्याची इच्छा होती. पण बीसीसीआय मात्र यासाठी तयार नव्हतं.

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुण खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जावी हा व्यवस्थापनाचा निर्णय कळवण्यात आल्यानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्याला स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी आणि नव्याने वरती येण्यासाठी काही आव्हानं हवी होती. सध्याच्या व्यवस्थापनाखाली, त्याला हवे असलेले स्वातंत्र्य, वातावरण मिळत नव्हतं असं म्हटलं जात आहे. मागील ड्रेसिंग रूमच्या तुलनेत सध्याच्या सेटअपमधील वातावरण खूप वेगळे होते.

विराट कोहली मागील काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये आव्हानांचा सामना करत होता. त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नव्हत्या. मागील तीन वर्षात त्याने फक्त 32 च्या सरासरीने धावा केल्य होत्या. यामुळे त्याला नवीन आव्हानं हवी होती. दुर्दैवाने आव्हानांशिवाय कसोटी क्रिकेट खेळण्यात त्याला रस नव्हता.

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीने निवृत्तीच्या निर्णयाआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि मित्र रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली. विराट कोहलीने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांच्याशी सल्लामसलत केली. पण यावेळी त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे समजू शकलं नाही. विराट आणि राजीव शुक्ला यांच्यातही बैठक होणार होती. मात्र भारत-पाकिस्तानातील तणावामुळे या भेटीसाठी योग्य वेळ मिळू शकली नाही.

रिपोर्टनुसार, विराट कोहली बीसीसीआयचा निवड समिती प्रमुख अजित आगरकरशीदेखील दोन वेळा फोनवरुन चर्चा केली. पण या चर्चेनंतरही विराट कोहलीला निवृत्तीच्या निर्णयावरुन मन वळवण्यात यश आलं नाही.

जर बीसीसीआयने इंग्लंड मालिकेनंतर बदलाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असता, तर विराट आणि रोहित दोघेही 5 सामन्यांच्या या कामगिरीनंतर निरोप घेऊ शकले नसते. परंतु, बोर्डाला एका निश्चित खेळ योजनेसह नवीन चक्र सुरू करायचे होते. म्हणून, निर्णय घ्यावा लागला असं समजत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!