Homeमहाराष्ट्रमुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी

मुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी


मुंबईसह उपनगरात अनेक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. कांदिवली, बोरिवरी, दहिसर, कुर्ला, सायन आणि ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस आला. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. मे महिना सुरु असून अंगाची उन्हामुळे लाही लाही होत असताना अचानक पावस आल्यामुळे वातावरण थोडा गारवा आला आहे. तर अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. (mumbai Navi Mumbai thane kalyan Palghar Rain with gusty winds Unseasonal rain maharahstra)

आज सायंकाळी वसई-विरार परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तासाभराच्या मुसळधार पावसात अनेक झाडे रस्त्यावर कोसळली, वीजेचे खांब पडले आणि वाहतूक ठप्प झाली. या वादळाचा फटका विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांनाही बसला. अनेक ठिकाणी लग्नसोहळ्याचे मंडप वाऱ्यामुळे उध्वस्त झाले.

कल्याणमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. तसेच पावसामुळे कल्याणमध्ये अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.

शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत झाडांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रेही उडाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावं अंधारात आहेत.

रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने पालघर जिल्ह्यातील अनेक भागात हाहाकार माजवला. समुद्रकिनारी असलेल्या अनेक बोटी एकमेकांवर आदळून मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचा नुकसान झाला आहे .तर दुसरीकडे ग्रामीण भागातील उन्हाळी भात शेती त्याचप्रमाणे वीट भट्ट्या आणि अनेक घरांची छप्पर उडून नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे सात आणि आठ मे या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसराई आहेत. त्यामुळे ह्या या लग्नासाठी उभारलेले मांडव वादळी वाऱ्याने उडवले आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारताचे C-295 विमान उत्पादन आणि योग पदके; मोदी म्हणतात भारत सुरक्षित

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात'च्या १३५व्या भागात सांगितले की, 'भारत समुद्रापासून आकाशापर्यंत सुरक्षित आहे. याच महिन्यात...

राम मंदिर देणगी चोरी- 8 आरोपींच्या घरी छापेमारी:एकाच वेळी छापा टाकला; टिन्नूच्या घराला कुलूप,...

0
राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या 8 आरोपींच्या घरी रविवारी सकाळी 7 वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या 6 पथकांनी एकाच वेळी आरोपींच्या...

28 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
रविवार, २८ जून रोजी मिथुन राशीच्या व्यक्तींचे दैनंदिन उत्पन्न आधीपेक्षा चांगले होऊ शकते आणि तरुणांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक...

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती

0
मराठी बातम्याखेळपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत...
spot_img

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती

0
मराठी बातम्याखेळपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत...

Virat Kohli Meets Ayush Mhatre at BCCI Centre Bengaluru

0
क्रीडा डेस्क1 तासापूर्वीलिंक कॉपी कराअंडर-19 वर्ल्डकप जिंकणारा भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने विराट कोहलीची भेट घेतली. शनिवारी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स...

औषध घेण्याचा योग्य मार्ग? जाणून घ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी:भारतात सुमारे 64.4 टक्के लोक डॉक्टरांच्या...

0
आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे तर आणतो, पण ती घेण्याच्या योग्य पद्धती आणि एक्सपायरीशी संबंधित नियमांकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे औषधाचा परिणाम...

‘वो सुबह हम से ही आएगी’ वर बोलले महेश भट्ट:रंगमंच आजही माणसाला माणसाशी जोडतो,...

0
मुंबईत लवकरच सादर होणाऱ्या 'वो सुबह हम से ही आएगी' या नाटकासंदर्भात चित्रपट निर्माता महेश भट्ट आणि संगीतकार अनु मलिक यांनी दिव्य मराठीशी...
error: Content is protected !!