Homeमहाराष्ट्र5 वर्षात विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा, सरकार शेतकऱ्यांसाठी आतातरी प्रामाणिक...

5 वर्षात विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा, सरकार शेतकऱ्यांसाठी आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल?


शेतकरी भरपाई: आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आलीय. एकीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाहीय. मागच्या काही वर्षात पिक विम्याची नीट नुकसान भरपाई मिळालनी नाहीय. मा मात्र या पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झालाय. तोही इतका की विमा कंपन्या करोडपती झाल्यात.

आपल्याकडे जनहिताच्या अनेक योजना या जनतेऐवजी धनदांडग्यांना अधिक धनवान करणाऱ्या ठरल्यात. तसाच प्रकार आता पीक विमा योजनेच्या बाबतीत घडलाय. कारण मागच्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत घट झालीय. मात्र त्याचवेळी मागच्या 5 वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र तब्बल 50 हजार कोटींचा नफा झालाय. एकट्या महाराष्ट्रातून तब्बल साडेदहा हजार कोटींचा नफा पीक विमा कंपन्यांनी कमावलाय.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 2019 ते 2024 या 5 वर्षांत एकूण 17 पीक विमा कंपन्यांना 1 लाख 54 हजार 543 कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता मिळाला. या 5 वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1 लाख 5 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. म्हणजेच उरलेली 49 हजार 704 कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमावलाय.

फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास शेतकरी बेहाल, विमा कंपन्या मालामाल अशी स्थिती आहे. राज्यात 2016-17 पासून पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 2016 ते 2024 या 8 वर्षांत विमा कंपन्यांना 43 हजार 201 कोटींचा हप्ता मिळाला. यात शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं दिलेली एकूण रक्कम आहे.विमा कंपन्यांकडून शेतक-यांना 32 हजार 610 कोटी रुपये भरपाई, विमा कंपन्यांनी शेतीच्या नुकसान भरपाईपोटी शेतक-यांना 32 हजार 610 कोटी रुपये दिले. म्हणजेच 8 वर्षात विमा कंपन्यांना 10 हजार 591 कोटींचा नफा झाला.

यावरुन आता विरोधकांनी विमा कंपन्या आणि सरकारवर टीकेची झोड उठवलीय. दरम्यान विमा कंपन्यांना मनमानी कारभार करु देणार नाही, मुख्यमंत्री विमा कंपन्यांवर लक्ष ठेवून आहेत इतकंच सावध उत्तर भाजपकडून देण्यात आलंय.

नैसर्गिक आपत्तीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याच्या काडीचा आधार मिळावा यासाठी पिकविमा योजना सुरु झाली. मात्र शेतकरी आणि सरकारकडून हप्त्यांची काडीकाडी जमा करुन नफ्याची मोळी आपल्याच पाठीवर टाकून पीक विमा कंपन्या गलेलठ्ठ झाल्यात. तेव्हा अशा पीकविमा कंपन्यांच्या पारदर्शक कारभारासाठी आणि पिचलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार किमान आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!