Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकअखेर हिंदु संघटनांची मागणी मान्य; ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ संमत ! आता खऱ्या अर्थाने...

अखेर हिंदु संघटनांची मागणी मान्य; ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ संमत ! आता खऱ्या अर्थाने ‘लाडक्या बहिणीं’चे संरक्षण होईल !

मुंबई – राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ संमत करण्यात आले, या स्तुत्य निर्णयाबद्दल हिंदु जनजागृती समिती राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करते. अनेक काळापासून हिंदु समाजाकडून या कायद्याची मागणी करण्यात येत होती, त्यानुसार आता राज्यात हा कायदा संमत झाला आहे. देशभरात हिंदु युवतींना फसवून होणारा ‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु समाजाला आर्थिक प्रलोभने दाखवून मोठ्या प्रमाणात होणारी ‘धर्मांतरे’ या कायद्यामुळे निश्चितच रोखली जातील, अशी आशा आहे. कायदा संमत झाला आहे, आता या कायद्याची अंमलबजावणी कठोरतेने ‍व्हायला हवी. यापूर्वी राज्य सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ना आर्थिक कवच देणारी योजना आणली, आता खऱ्या अर्थाने त्यांना संरक्षण देणारा कायदा आणून सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ना सुरक्षित केले आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली आहे.
हिंदु जनजागृती समिती गेल्या २० वर्षांपासून संघर्ष करत ‘लव्ह जिहाद’ या समस्येबद्दल देशभरात जागृती कऱत आहे.ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’ हा शब्द म्हणण्याचीही चोरी होती, अशा वेळी म्हणजे २००६ मध्ये या संदर्भातील पहिला ग्रंथ समितीने प्रकाशित केला. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविषयावर समितीच्या वक्त्यांनी हजारो व्याख्याने घेतली; शेकडो सभांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली; प्रदर्शनांद्वारे जागृती करण्यात आली; श्रद्धा वालकरसारख्या प्रकरणांच्या वेळी शेकडो आंदोलने करण्यात आली; हिंदु जनसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. इतकंच काय तर ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या शेकडो युवतींचे ‘काऊन्सिलिंग’ही समितीने केले.  परिणामी १२ राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदे बनवले गेले आणि ३ राज्यांत हे कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत आहेत. आता असा कायदा करणारे महाराष्ट्र १३ वे राज्य ठरले.
हिंदु जनजागृती समितीचे ऱाज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी याविषयी सांगितले की, प्रलोभने दाखवून होणाऱ्या धर्मांतरामुळे पूर्वोत्तर भारतातील ७ राज्यांपैकी ५ राज्ये ही ख्रिस्तीबहुल झाली आहेत. एकूणच भारतातील ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदु ‘अल्पसंख्यांक’ झाले आहेत, यातून ‘धर्मांतरा’ची समस्या किती गंभीर आहे, हे लक्षात येते. राज्य सरकारने हा कायदा केला, याबद्दल पुन्हा सरकारचे अभिनंदन. परंतु हा कायदा समाजात पोहोचण्यासाठी या कायद्याच्या प्रचारासाठी सरकारने प्रयत्न करावेत. राज्यातील प्रत्येक शाळेत या कायद्याविषयी जागृती व्हावी, आदिवासीबहुल भागांमध्ये या कायद्याविषयी प्रबोधन व्हावे, यासाठी सरकारने योजना आखावी, असे आवाहनही श्री. घनवट यांनी समितीच्या वतीने केले आहे.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!