राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी योग्य नसल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी शिमला कराराची देखील आठवण करून दिली. या करारानुसार दोन्ही देशांमधील वादात तिसरा कोणीही मध
?
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीने हा मार्ग काढण्यात आल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशांचे आभारही मानले. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता विरोधकांकडून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
मला शिमला करार आठवतोय. शिमला करार इंदिरा गांधी आणि झुलफिकार अली भुट्टो यांच्यात झाला होता. त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्हीच सोडवणार, त्यात इतरांनी हस्तक्षेप करायचा नाही असे ठरले होते. दोन देशांतील समस्येवर तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करून नये असा हा करार झाला आहे. असे असताना अमेरिकेची मदत घेण्याची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न कोणी विचारला तर केंद्राला यावर उत्तर द्यावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप योग्य नाही
आतापर्यंत दोन देशांतील अंतर्गत प्रश्नांत आपण कोणालाही हस्तक्षेप करू दिलेला नाही. पण पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अंतर्गत मुद्द्यावर चर्चा आहे. आपल्या घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालणार नाही. ही पहिलीच वेळ आहे, अमेरिकन अॅथोरिटीने पब्लिकली पुढे येऊन सांगितले, हे ठीक नाही, असे शरद पवार म्हणाले.
विशेष अधिवेशनात किती माहिती दिली जाईल सांगता येत नाही
विरोधकांकडून युद्धजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. त्यावरही शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. संरक्षणाशी संबंधित काही माहिती देता येत नाही. अशी माहिती गोपनीय ठेवावी लागते. अधिवेशन बोलवायचे असेल तर बोलवा. मात्र सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवून, संरक्षण अधिकारी यांना बोलावून त्यांच्याकडून काय स्थिती आहे आपण काय केले आहे याची माहिती दिली पाहीजे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण रात्री 8 वाजता आहे, तुम्ही ऐका आणि मीही ऐकतो त्यानंतर आपण बोलू. पण, अमिरिकेच्या हस्तक्षेपाबाबत माहिती तर दिली गेली पाहीजेच, असेही शरद पवारांनी म्हटले.































