रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२५ नंतर, इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची कमान रोहितच्या हातात नसून नवीन कर्णधाराच्या हातात असेल. टीम इंडियाला पुढील महिन्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करायचा आहे, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही मोठी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून काढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे अहवालातून समोर आले आहे. एवढेच नाही तर निवड समितीच्या या निर्णयाला बीसीसीआय देखील पाठिंबा देणार आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.































