Homeमनोरंजनपाकिस्तानच्या हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दावा केला

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दावा केला


बीसीसीआय: 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती समोर आल्यावर भारत सरकारने आता पाकिस्तान विरुद्ध मोठी पाऊल उचलली आहेत. आता पहलगाम हल्ल्याचा बदला बीसीसीआय सुद्धा घेऊ शकते. 2025 च्या सप्टेंबर महिन्यात टी 20 फॉरमॅटमध्ये एशिया कप खेळवला जाणार आहे. याचं यजमानपद हे भारत आणि श्रीलंकेकडे असणार असून या स्पर्धेतून बीसीसीआय पाकिस्तानला बाहेर काढू शकते असा दावा सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केला आहे.

पाकिस्तानवर BCCI घेणार ऍक्शन :

सुनील गावसकर यांचं म्हणणं आहे की, ‘पहलगाम हल्ल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. अशातच आता पाकिस्तानचा आशिया कपमध्ये सहभाग जवळपास अशक्यच मानला जात आहे. बीसीसीआय नेहमीच भारत सरकारच्या आदेशाला मानत आली आहे. अशातच आशिया कपच्या आयोजनाबाबत सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळू शकतं.

गावस्करने सांगितलं की, ‘बीसीसीआयचं नेहमी तेच करत जे त्यांना भारत सरकार सांगतं. त्यामुळे मला वाटत नाही की आशिया कपच्या बाबत यात कोणताही बदल होईल. आशिया कपच्या या एडिशनचं यजमानपद हे भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे मी आता पाकिस्तानला आशिया कपचा भाग बनताना पाहत नाही’. परंतु हे सांगताना गावसकर यांनी असेही म्हटले की पुढील दोन महिन्यात दोन्ही देशांमधील संबंध कसे राहतात यावर खूप काही अवलंबून असेल.

हेही वाचा : IPL 2025 च्या 51 मॅचनंतर कोणाकडे आहे ऑरेंज आणि पर्पल कॅप? ‘हा’ खेळाडू देतोय विराट आणि सूर्याला टक्कर

एसी बाबत काय म्हणाले गावसकर?

सुनील गावसकर यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानला जर स्पर्धेतून बाहेर करायचं असेल तर एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) ला भंग करावं लागेल. म्हणजेच ACC चं भविष्य सुद्धा धोक्यात असून जर दोन्ही देशांमधील हे संबंध सुधारले नाहीत तर ACC चं अस्तित्वच उरणार नाही. गावसकरांच म्हणणं आहे की आशिया  कपच्या जागी फक्त 3 किंवा 4 देशांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते.

पुढे गावस्कर म्हणाले की, ‘मला माहित नाही हे कसं होईल. कदाचित ACC भंग करावं लागू शकतं आणि केवळ तीन देशांचा दौरा केला जाऊ शकतो, ज्यात फक्त तीन देशांमध्ये ही स्पर्धा होऊ शकते. किंवा 4 देशांमध्ये स्पर्धेचे आयोजन केलं जाऊ शकतं ज्यात हॉंगकॉंग किंवा यूएईचा समावेश केला जाऊ शकतो. परंतू हे सगळं पुढील दोन महिन्यात भारत – पाकिस्तानचे संबंध कसे राहतात यावर अवलंबून आहे’.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!