Homeमहाराष्ट्रप्रवीण दरेकरांचा विरोधकांना टोला:अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना लगेच राजीनामा मागणे योग्य...

प्रवीण दरेकरांचा विरोधकांना टोला:अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना लगेच राजीनामा मागणे योग्य नाही

मुंबईतील मुसळधार पाऊस, पाणी तुंबणे, प्रशासनावरील टीका आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अश्विनी भिडे या कर्तबगार अधिकारी असून एखादी दुर्दैवी घटना घडताच त्यांचा राजीनामा मागणे उचित नसल्याचे दरेकर म्हणाले. तसेच आपत्तीच्या काळात राजकारण करण्याऐवजी त्रुटी दूर करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर भाष्य केले. ‘अश्विनी भिडे यांचा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम’ मुंबईतील दुर्घटनांनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, एखादी घटना घडली म्हणून लगेच अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना पद सोडण्यास सांगणे योग्य नाही. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रकल्पांमध्ये अश्विनी भिडे यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महापालिका आयुक्त म्हणून त्यांना अजून फार काळ झालेला नाही. पुढील काही महिन्यांत आणि पुढील वर्षभरात त्या आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनात आवश्यक बदल घडवून आणतील, असा विश्वास असल्याचे दरेकर यांनी व्यक्त केले. मुंबईतील पावसावरून विरोधकांवर टीका मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून विरोधकांनी भाजपवर टीका केल्याबाबत दरेकर म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींचा राजकीय वापर करणे ही योग्य परंपरा नाही. विरोधकांकडे कोणतेही सकारात्मक काम नसल्यामुळे ते केवळ उणिवा शोधून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्रुटी असतील तर त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील, मात्र अशा प्रसंगांचे राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित साटम प्रकरणावर मुख्यमंत्र्यांवर विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित साटम प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री त्या पत्राचा योग्य प्रकारे विचार करतील आणि काय करायचे याचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री आवश्यक तेथे संबंधितांना खडसावत असतात. मात्र त्यातील प्रत्येक गोष्ट सार्वजनिकपणे किंवा माध्यमांसमोर येतेच असे नाही, असेही त्यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाष्य टाळले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील पक्ष संघटनेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर दरेकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हा विषय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या स्तरावरील असल्याने त्यावर भाष्य करणे ना आपल्या अधिकारात आहे, ना ते योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘महायुतीत कोणताही अंतर्गत वाद नाही’ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर मतभेद असल्याच्या चर्चांनाही दरेकर यांनी फेटाळले. एखाद्या घटनेनंतर वेगवेगळी मते व्यक्त होऊ शकतात. मात्र त्याचा अर्थ महायुतीत कुरघोडी किंवा वाद आहेत असा होत नाही, असे ते म्हणाले. मुंबई महापालिका महायुतीच्या माध्यमातून चालवली जात असून नागरिकांच्या हितासाठी जे योग्य असेल त्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करतील आणि त्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारतील, असेही दरेकर यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील पुरस्कारांचे कौतुक यावेळी दरेकर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आल्याचे सांगितले. यंदा सुमारे १८ ते २० पुरस्कार देण्यात आले असून भविष्यात हरित पर्यावरण, डिजिटायझेशन यांसारख्या क्षेत्रांसाठीही स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे राज्यातील सहकार चळवळीला नवी गती मिळत असून ‘नमो टॅक्सी’, ‘सहकार टॅक्सी’सारखे उपक्रमही पुढे नेले जात असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!