बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेली चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, वड, पिंपळ यासारखी शेकडो मौल्यवान झाडे तसेच विविध औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर तोड केली आहे. यातील अनेक वृक्ष ७० ते ८० वर्षांहून अधिक जुने असून, पर्यावरणीय, जैवविविधता व व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते. विशेषतः चंदनासारख्या लाखो रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या वृक्षांची नियोजनबद्ध पद्धतीने व संगनमताने तोड करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित वृक्ष धरण, कालवा किंवा प्रकल्पाच्या इतर कोणत्याही घटकास अडथळा निर्माण करत नसतानाही त्यांची तोड केल्याचा दावा केला आहे. तसेच कोणतीही वैध प्रशासकीय मंजुरी, वन विभागाची पूर्वपरवानगी, पंचनामा, मूल्यांकन अहवाल किंवा कायदेशीर लिलाव प्रक्रिया न करता वृक्षतोड केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात काही लाकूड व्यापारी, कंत्राटदार तसेच संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या संगनमतातून वनसंपदेची अवैध विक्री करून शासनाच्या मालमत्तेचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. १५ वर्षांतील परवाने शोधावेत या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यासाठी वन, महसूल, जलसंपदा आणि पोलिस विभागाचे एसआयटी नियुक्त करावी, मागील १५ वर्षांतील सर्व वृक्षतोड परवानग्या, पंचनामे, वाहतूक परवाने, लिलाव नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, दोषी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदार नागेश चव्हाण यांनी केली आहे.
Source link
जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
लखनऊ कोचिंग आगीत 15 ठार; इमारत अनधिकृत:2016 मध्ये पाडण्याचे दिले होते आदेश; 4 अधिकारी...
लखनऊमधील कोचिंगला आग लागल्याच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 10 पुरुष आहेत. बहुतांश जण 20 ते 30...
25 ला निर्जला एकादशी, 29 ला वट पौर्णिमा:पाण्याचे महत्त्व समजावून सांगणारे एक व्रत, दुसरे...
जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन मोठे व्रत येतील. 25 जून, गुरुवारी निर्जला एकादशी आणि 29 जून, सोमवारी वटपौर्णिमा व्रत केले जाईल. हे दोन्ही व्रत...
Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली....
Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...
विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...
पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....





























