मुंबई हल्ला 26/11: (Mumbai Terrorist attacks) मुंबईत 26/11 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं सारं शहर सुन्न झालं होतं. शहरातील काही प्रमुख ठिकाणांना केंद्रस्थानी ठेवत दहशतवाद्यांनी पूर्वनियोजित कटानुसार शहरात हल्ले चढवले. ग्रेनेडचे स्फोट, बेछूट गोळीबार… आणि कैक निष्पापांचे बळी या दहशतवाद्यांनी घडवले आणि मुंबई शहरानं पाहिले काही रक्तरंजित दिवस. वर्ष सरली, मात्र ते दिवस आणि हा हल्ला कोणीही विसरु शकलेलं नाही. याच मुंबईवर झालेल्या भयंकर आघातासंदर्भात हैराण करणारा आणि अनेक प्रश्न उपस्थित करणारा अहवाल नुकताच जगासमोर आला आहे.
अहवालात जैश…चा म्होरक्या मसूद अजहरचंही नाव…
भारतानं 26/11 हल्ल्यामागचा खरा सूत्रार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरसोबतच पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या अनेक मुख्य सूत्रधारांचा खात्मा करण्याची संधी गमावली.
‘संडे गार्डियन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार कशा पद्धतीनं दिल्लीमधील नेतृत्त्वानं कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची संधी गमावली यावर अहवालात खुलासा करणअयात आला. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी गोपनियतेच्या अटीवर ही माहिती दिली. जिथं त्यांनी सांगितल्यानुसार यंत्रणांनी सर्व माहिती गिली होती, इस्लामाबाद भारतावर कोणताही हल्ला करण्याच्या मनस्थितीतही नव्हतं, ज्यामुळं भारताकडून होणारा हल्ला रोखण्यासाठी त्यावेळी पाकिस्तान जवळपास जैशच्या म्होरक्याचा ‘बळी’ देण्यासही तयार असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला.
आमच्या बाजूनं सर्व गोष्टींसाठी मंजुरी असतानाही…
नाव न सांगण्याच्या अटीवर गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही या सर्व बाबतीत मंजुरी दिली होती, आवश्यक ती सर्व माहिती मिळवून ती पुढं पुरवली होती. आमच्या मानवी गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार त्यावेळी पाकिस्तान लष्करी, आर्थिकदृष्टा किंवा इतर सर्व तयारीनिशी, कोणत्याही वादाला आणखी धुमसवण्यासाठी तयारच नव्हतं. त्यांना युद्ध टाळायतं होतं. पाकिस्तानकडून हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाण्याचा धोका अतिशय कमी होता.’
दिल्लीतील नेतृत्त्वानं का घेतला नाही मोठा निर्णय?
दिल्लीतील नेतृत्त्वाला तेव्हा संपूर्ण माहिती आणि कारवाईसाठीची वाट मोकळी करून देण्यात आली होती. हल्ल्यासाठी इस्लामाबाद ही जागा निवडली गेली होती, ज्याची पाकिस्तानला पुसटशी कल्पनाही नव्हती. सर्व आवश्यक निकषांवर आधारित माहिती, परवानगी देऊनही दिल्लीत राजकीय नेतृत्त्वापाशीच हा निर्णय रखडला, असं या माहितीपर अहवालाच सांगण्यात आलं.
अधिकाऱ्यांनी माहिती देत केलेल्या दाव्यानुसार मुंबई हल्ल्याला सुरुवातीचे काही आठवडे उलटल्यानंतर यंत्रणांनी पाकिस्तनातील दहशतवादी तळांची अचूक ठिकाणं हेरली होती. जिथं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि लष्कर-ए-तोयबाच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांचाही ठिकाणा होता. इतकंच नव्हे, तर पाकिस्तानकडून त्यावेळी जाणीवपूर्वकरित्या या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली उघड करत इस्लामाबादमध्ये त्यांचा ‘बळी’ दिला जाऊ शकतो, किंवा प्रकरण चिघळू न देण्यासाठी तिथं त्यांचा खात्मा केला जाऊ शकतो इथपर्यंतचे संकेत दिले होते. इतकंच नव्हे तर भारतीय हेरांची या भागात टेहळणी सुरू असल्य़ाची पाकिस्तानला कल्पना होती, ज्यामुळं त्यांनीच दहशतवाद्यांना भारताकडून हल्ला करता येईल अशा ठिकाणापर्यंत आणलं होतं, मात्र आपण कोणतीही पावलं उचलली नाहीत, असा खळबळजनक दावा केला.
FAQ
‘संडे गार्डियन’ अहवालात काय खुलासा करण्यात आला?
अहवालानुसार, 26/11 मुंबई हल्ल्यानंतरच्या सुरुवातीच्या आठवड्यांत भारतानं जैश-ए-मोहम्मदचे म्होरक्या मसूद अजहर आणि लष्कर-ए-तोयबाच्या प्रमुख सूत्रधारांचा खात्मा करण्याची दुर्मीळ संधी गमावली.
गुप्तचर यंत्रणांनी काय माहिती पुरवली?
गुप्तचर अधिकाऱ्यांनी गोपनियतेच्या अटीवर सांगितलं की, पाकिस्तान लष्करी, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत होता आणि युद्ध टाळण्यासाठी तयार होता. हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली जाणीवपूर्वक उघड केल्या होत्या.
इस्लामाबादमध्ये कारवाईची योजना काय होती?
इस्लामाबाद ही जागा निवडण्यात आली होती, कारण पाकिस्तानला याबाबत पुसट कल्पनाही नव्हती. गुप्तचर यंत्रणांनी सर्व आवश्यक माहिती आणि परवानग्या दिल्या होत्या, ज्यात दहशतवाद्यांना भारताकडून हल्ला करता येईल अशा ठिकाणी आणण्यात पाकिस्तानचं योगदान होतं.































