Homeदेश-विदेशबिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसाद एक धरण तयार करेल जिथे...

बिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसाद एक धरण तयार करेल जिथे 140 कोटी जोडले जातील


बिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसादः पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीमवरुन मागील काही दिवसांमध्ये भारताविरुद्ध अनेकदा गरळ ओकल्याचं पाहायला मिळालं. असं असतानाच आता पाकिस्तानमधील नेत्यांनाही भारताविरुद्ध विधानं करण्याची खुमखुमी आल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी! त्यांनी एका जाहीर भाषणामधून भारताला हल्ल्याची धमकी दिली. या धमकीवरुन बिलावल यांची खिल्ली उडवली जात असतानाच ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी मंगळवारी बिलावल यांची लाजच काढली.

बिलावल काय म्हणाले?

सिंध सरकारच्या संस्कृती विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बिलावल भुट्टो यांनी भारताला इशारा दिला होता. त्यांनी “सिंधू नदीचे पाणी वळवणे हा पाकिस्तानच्या इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर”, विशेषतः सिंधवर हल्ला आहे,” असं म्हटले होते. बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून विचाराधीन असलेला सिंधू नदीवरील पाणी प्रकल्प हा पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचा आरोप करत भारतावर हल्ल्याचा इशारा दिला. तसेच भुट्टोंनी मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचा पराभव झाल्याचा दावाही केला होता. यावरुनच मिथुन चक्रवर्तींनी आपल्या खास शैलीत टोला लगावला.

आधी केला ब्रम्होसचा उल्लेख

बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून भारताला दिलेल्या इशाऱ्याबद्दल पत्रकारांनी मिथुन चक्रवर्तींना प्रश्न विचारला. यावेळेस बोलताना मिथुन चक्रवर्तींनी पाकिस्तानी जनतेला युद्ध नकोय पण तेथील राजकारणी वाचाळवीर असून वाटेल ती विधानं करत असल्याचं म्हटलं. पुढे बोलातना मिथुन यांनी पाकिस्तानी नेते अशीच बडबड करत राहिले तर भारत त्यांच्यावर ब्रम्होस क्षेपणास्रांचा मार करेल असं म्हटलं. मात्र त्यानंतरही हे सुरु राहिलं तर काय करता येईल याबद्दल बोलताना मिथुन यांनी अगदीच खोचक विधान करत बिलावल यांची खिल्ली उडवली.

धरणात 140 कोटी भारतीय लघवी करतील अन्…

पाकिस्तानचे बिलावल भुट्टो म्हणत आहेत की भारताविरुद्ध युद्ध करु, असं म्हणत मिथुन यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “पाकिस्तानच्या जनतेबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. त्यांना युद्ध नकोय. पण अशा गोष्टी ते बरळत राहिले तर डोकं फिरल्यास एकामागून एक ब्रम्होस क्षेपणास्रं डागली जातील. आणि काहीच नाही झालं तर आपण एक धरण बांधू, तिथे 140 कोटी भारतीय लघवी करतील. त्यानंतर त्या धरणाचे दरवाजे उघडू. असं केलं तर एकही गोळी न झाडता त्सुनामी येईल आणि त्यात ते वाहून जातील,” असं विधान मिथुन चक्रवर्तींनी केलं.

“मी हे सर्व त्यांच्यासाठी (बिलावल भुट्टो) सांगतोय,” असंही सांगायला मिथुन विसरले नाहीत.

FAQ

मिथुन चक्रवर्ती यांनी पाकिस्तानी जनतेबद्दल काय म्हटले?
मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले की, त्यांचे पाकिस्तानी जनतेबद्दल कोणतेही वाईट मत नाही आणि त्यांना युद्ध नको आहे. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या वाचाळवीरपणावर आणि त्यांच्या बेजबाबदार विधानांवर टीका केली.

मिथुन चक्रवर्ती यांचे विधान चर्चेत का?
मिथुन चक्रवर्ती यांचे विधान प्रामुख्याने विनोदी आणि खोचक आहे, ज्याचा उद्देश बिलावल भुट्टो यांच्या धमकीला हलक्या भाषेत प्रत्युत्तर देणे आणि त्यांची खिल्ली उडवणे हा होता. त्यांनी युद्धाच्या गंभीर परिणामांऐवजी अतिशयोक्तीपूर्ण आणि विनोदी भाषा वापरली.

सिंधू जल कराराचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
बिलावल भुट्टो यांनी भारताने विचाराधीन असलेल्या सिंधू नदीवरील पाणी प्रकल्पावरून सिंधू जल कराराच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला, ज्याला त्यांनी पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी धोका ठरवले. यावरूनच त्यांनी भारताला हल्ल्याची धमकी दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!