बिलावल भुट्टो यांना मिथुन चक्रवर्ती विचित्र प्रतिसादः पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीमवरुन मागील काही दिवसांमध्ये भारताविरुद्ध अनेकदा गरळ ओकल्याचं पाहायला मिळालं. असं असतानाच आता पाकिस्तानमधील नेत्यांनाही भारताविरुद्ध विधानं करण्याची खुमखुमी आल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी! त्यांनी एका जाहीर भाषणामधून भारताला हल्ल्याची धमकी दिली. या धमकीवरुन बिलावल यांची खिल्ली उडवली जात असतानाच ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी मंगळवारी बिलावल यांची लाजच काढली.
बिलावल काय म्हणाले?
सिंध सरकारच्या संस्कृती विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बिलावल भुट्टो यांनी भारताला इशारा दिला होता. त्यांनी “सिंधू नदीचे पाणी वळवणे हा पाकिस्तानच्या इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर”, विशेषतः सिंधवर हल्ला आहे,” असं म्हटले होते. बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून विचाराधीन असलेला सिंधू नदीवरील पाणी प्रकल्प हा पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचा आरोप करत भारतावर हल्ल्याचा इशारा दिला. तसेच भुट्टोंनी मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचा पराभव झाल्याचा दावाही केला होता. यावरुनच मिथुन चक्रवर्तींनी आपल्या खास शैलीत टोला लगावला.
आधी केला ब्रम्होसचा उल्लेख
बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून भारताला दिलेल्या इशाऱ्याबद्दल पत्रकारांनी मिथुन चक्रवर्तींना प्रश्न विचारला. यावेळेस बोलताना मिथुन चक्रवर्तींनी पाकिस्तानी जनतेला युद्ध नकोय पण तेथील राजकारणी वाचाळवीर असून वाटेल ती विधानं करत असल्याचं म्हटलं. पुढे बोलातना मिथुन यांनी पाकिस्तानी नेते अशीच बडबड करत राहिले तर भारत त्यांच्यावर ब्रम्होस क्षेपणास्रांचा मार करेल असं म्हटलं. मात्र त्यानंतरही हे सुरु राहिलं तर काय करता येईल याबद्दल बोलताना मिथुन यांनी अगदीच खोचक विधान करत बिलावल यांची खिल्ली उडवली.
धरणात 140 कोटी भारतीय लघवी करतील अन्…
पाकिस्तानचे बिलावल भुट्टो म्हणत आहेत की भारताविरुद्ध युद्ध करु, असं म्हणत मिथुन यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “पाकिस्तानच्या जनतेबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. त्यांना युद्ध नकोय. पण अशा गोष्टी ते बरळत राहिले तर डोकं फिरल्यास एकामागून एक ब्रम्होस क्षेपणास्रं डागली जातील. आणि काहीच नाही झालं तर आपण एक धरण बांधू, तिथे 140 कोटी भारतीय लघवी करतील. त्यानंतर त्या धरणाचे दरवाजे उघडू. असं केलं तर एकही गोळी न झाडता त्सुनामी येईल आणि त्यात ते वाहून जातील,” असं विधान मिथुन चक्रवर्तींनी केलं.
#वॉच कोलकाता, डब्ल्यूबी: बिलावल भुट्टो यांनी सिंधू जल उपचाराबद्दल दिलेल्या निवेदनावर, भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती म्हणतात, “… अगर आसी बाटेइन कार्ते राहेनेगे और हमारी खोपदी खोपदी खोपडी एके के के के के के के के के रहई इक बीएके बीएएके बीएएके बीएएके बीएएके बीएएके बीएएके बीएएके बीएएके बीएएके बाबाई चालेगा … आम्ही धरण बांधण्याचा विचार केला आहे जेथे 140… pic.twitter.com/bixisyefzm
– वर्षे (@अनी) 12 ऑगस्ट, 2025
“मी हे सर्व त्यांच्यासाठी (बिलावल भुट्टो) सांगतोय,” असंही सांगायला मिथुन विसरले नाहीत.
FAQ
मिथुन चक्रवर्ती यांनी पाकिस्तानी जनतेबद्दल काय म्हटले?
मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले की, त्यांचे पाकिस्तानी जनतेबद्दल कोणतेही वाईट मत नाही आणि त्यांना युद्ध नको आहे. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या वाचाळवीरपणावर आणि त्यांच्या बेजबाबदार विधानांवर टीका केली.
मिथुन चक्रवर्ती यांचे विधान चर्चेत का?
मिथुन चक्रवर्ती यांचे विधान प्रामुख्याने विनोदी आणि खोचक आहे, ज्याचा उद्देश बिलावल भुट्टो यांच्या धमकीला हलक्या भाषेत प्रत्युत्तर देणे आणि त्यांची खिल्ली उडवणे हा होता. त्यांनी युद्धाच्या गंभीर परिणामांऐवजी अतिशयोक्तीपूर्ण आणि विनोदी भाषा वापरली.
सिंधू जल कराराचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
बिलावल भुट्टो यांनी भारताने विचाराधीन असलेल्या सिंधू नदीवरील पाणी प्रकल्पावरून सिंधू जल कराराच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला, ज्याला त्यांनी पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी धोका ठरवले. यावरूनच त्यांनी भारताला हल्ल्याची धमकी दिली.
































