Homeदेश-विदेशदुबई हा भारताचा एक भाग होता.

दुबई हा भारताचा एक भाग होता.


दुबई आणि भारत: दुबई जगातील सर्वात श्रीमंत शहर. जगभरातील पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन. भारतीयांना तर दुबईचे विशेष आकर्षण आहे. दुबईबाबतचा एक शॉकिंग इतिहास फारच क्वचित लोकांना माहित आहे. एकेकाळी दुबई भारताचाच भाग होता. अगदी नकाशातही दुबई भारतात दिसायची. इतकचं नाही तर दिल्लीचे राज्य कुवेतपर्यंत पसरले होते. जाणून घेऊया नेमका इतिहास.

20 व्या शतकाच्या सुरुवातीला दुबई, कुवेत आणि अरबी द्वीपकल्पाचा मोठा भाग ब्रिटिश भारतीय साम्राज्याखाली होता.  त्यावेळी या भागांवर दिल्लीतून राज्य केले जात होते. भारतीय सैनिकांच्या देखरेखीखाली हे भाग भारताचा भाग मानले जात होते. अरबी द्वीपकल्पाचा एक तृतीयांश भाग ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा भाग होता. एडन ते कुवेत पर्यंत, हे भाग दिल्लीत बसलेल्या व्हाइसरॉयच्या अधीन होते. या प्रातांचा कारभार हा भारतीय राजकीय सेवेद्वारे चालवला जात असे. त्यावेळी येमेनमधील एडनसारख्या भागात भारतीय पासपोर्ट जारी केले जात होते. एडन हे मुंबई प्रांताचा भाग म्हणून पाहिले जात असे. ते भारताचे सर्वात पश्चिमेकडील बंदर होते.

ब्रिटिश भारताच्या नकाशांमध्ये आखाती प्रदेशांचा समावेश होता, परंतु ते गुप्त ठेवण्यात आले होते. ऑट्टोमन किंवा सौदी राजवटींना द्वेष येऊ नये म्हणून ते सार्वजनिक कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आले नव्हते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे एक सुनियोजित पाऊल उचलले होते. अबू धाबी सारख्या आखाती प्रदेशांना जयपूर सारख्या भारतीय संस्थानांसारखे वागवले जात असे. व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी ओमानलाही बलुचिस्तान सारखे संस्थान बनवावे असे सुचवले. यावरून असे दिसून येते की आखाताला भारताचा भाग मानण्याचा विचार किती खोलवरचा होता.

1931 मध्ये महात्मा गांधी जेव्हा एडनला भेट दिली तेव्हा अनेक अरब तरुण त्यांना भारतीय राष्ट्रवादी म्हणून भेटले. यावरून असे दिसून येते की आखाती देशातील लोक भारताशी जोडलेले होते. त्यावेळी ब्रिटिश जनतेलाही या नात्याची पूर्ण जाणीव नव्हती. 1920 च्या दशकात भारतीय राष्ट्रवाद वाढू लागला आणि आखात भारताचा भाग आहे ही कल्पना कमकुवत झाली. 1 एप्रिल 1937 रोजी, एडन भारतापासून वेगळे झाले आणि ब्रिटिश वसाहतवादी साम्राज्याचा भाग बनले. ही आखाताच्या अलिप्ततेची सुरुवात होती.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, 1 एप्रिल 1947 रोजी दुबई, कुवेत सारखे आखाती प्रदेश औपचारिकपणे भारतापासून वेगळे झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की आखाताची जबाबदारी भारत किंवा पाकिस्तानला देणे योग्य ठरणार नाही. त्यानंतर हे भाग लंडनच्या अखत्यारीत आले. 1971 पर्यंत आखाती देशांमध्ये भारतीय रुपया अधिकृत चलन म्हणून वापरला जात होता. ब्रिटिश इंडिया शिपिंग लाइन ही आखाती देशांमध्ये वाहतुकीचे मुख्य साधन होती. आखाती देशातील 30 संस्थाने भारतीय वंशाच्या ब्रिटिश रहिवाशांकडून चालवली जात होती.

1971 मध्ये, ब्रिटनने आखातातील आपल्या वसाहतवादी जबाबदाऱ्या सोडल्या. ब्रिटिश साम्राज्याच्या पतनाचा हा शेवटचा टप्पा होता. यानंतर, आखाती देशांनी त्यांच्या इतिहासातून ब्रिटिश भारताशी असलेले संबंध जवळजवळ पुसून टाकले. आज दुबई हा मध्यपूर्वेतील वेगाने विकसीत होणारा प्रांत आहे.  परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की ते एकेकाळी ब्रिटिश भारताचा भाग होते. लाखो भारतीय आणि पाकिस्तानी लोक तिथे राहतात, परंतु हे ऐतिहासिक नाते आता फक्त पुस्तकांमध्येच आहे. हा प्रशासकीय निर्णय इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!