Homeदेश-विदेश76 लाख पावत्या कुठं आहेत?; सरकार आणि निवडणूक आयोगाला प्रकाश आंबेडकरांनी 3...

76 लाख पावत्या कुठं आहेत?; सरकार आणि निवडणूक आयोगाला प्रकाश आंबेडकरांनी 3 प्रश्न विचारून केली कोंडी

देश विदेश : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टानं फेटाळलीये. कोर्टानं याचिकेत काहीही दम नसल्याचा निर्णय दिला असला तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांचं त्यानं समाधान झालेलं नाहीय. प्रकाश आंबेडकरांनी सरकारला आणि निवडणूक आयोगाला तीन प्रश्न विचारुन कोंडीत पकडलंय.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेवर आक्षेप नोंदवणारी चेतन अहिरे यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीये. याचिका फेटाळली असली तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांच्या मनातल्या तीन प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही असं आंबेडकरांनी सांगितलंय.

76 लाख पावत्या कुठं आहेत?

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघ मिळून तब्बल 76 लाख मतं वाढली…मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्राच्या आवारात जे मतदार असतात त्या मतदारांना पावत्या दिल्या जातात. त्या पावत्या निवडणूक आयोग का देत नाही त्याचा रेकॉर्ड ठेवला की नाही असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारलाय.

96 मतदारसंघात मतदान, मतमोजणीत तफावत कशी?

विधानसभा निवडणुकीत जवळपास 96 मतदारसंघात झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यात तफावत निघाली. मतांची तफावत असताना निकाल जाहीर करु नये असा नियम आहे. तरीही त्या 96 मतदारसंघांचा निकाल कसा जाहीर करण्यात आला असा सवालही आंबेडकरांनी विचारलाय.

निवडणूक नियमानुसार झाली का?

विधानसभा निवडणूक ही कायदेमंडळानं बनवलेल्या नियमानुसार झाली का?. निवडणूक आयोगानं तयार केलेले नियम पाळले गेले का या प्रश्नांची उत्तर कोर्टात मिळाली नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय.

न्यायालय काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नोंदवलेले मतदान यात विसंगती असल्याचा याचिकाकर्त्यांने केलेला दावा हा एका वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे केला आहे.

मतदानाच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच संध्याकाळी 6 वाजता झालेल्या मतदानात गैरप्रकार वा फसवणूक झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला. मात्र, त्यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली दिसून येत नाही. त्या संदर्भात कुठलीही सामग्री याचिकेसोबत सादर केलेली नाही.

हरि विष्णू कामथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला युक्तीवाद स्वीकारता येणार नाही.

याचिका फेटाळली असली तरी  प्रकाश आंबेडकर आणि याचिकाकर्त्यांचं समाधान झालेलं नाही. उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर जनतेच्या कोर्टात जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!