त्र्यंबकेश्वर व नाशिकमध्ये २०२७ ला २ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान कुंभमेळ्यात प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा अमृतस्नान होणार आहेत. २२ महिन्यांचे पर्व असून नाशिकमध्ये ४४ तर त्र्यंबकेश्वरला ५३ पर्वस्नानाचे मुहूर्त आहेत. सरकारने १५ हजार काेटींचा प्राथमिक आर
?
जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस व १३ आखाड्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुढील वर्षी ३१ ऑक्टाेबरला दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांनी रामकुंडावर ध्वजाराेहणाने कुंभमेळा सुरू होईल. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वरला कुशावर्ताप्रमाणेच स्नानासाठी वेगळे कुंड तसेच नाशिकमध्येही घाटांची संख्या वाढवण्यात येईल.
‘दिव्य मराठी’ने उपस्थित केलेल्या या ५ मुद्द्यांवर चर्चा
1. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामयस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्याची साधू-महंतांची मागणी फडणवीस : साधुग्रामसाठी यंदा शासनाकडून कामयस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठक झाली असून लवकरच निर्णय हाेणार आहे. 2. सिंहस्थ प्राधिकरणामध्ये अधिकाऱ्यांसाेबत समावेशाची साधू-महंतांची मागणी या मुद्द्यावर फडणवीस यांनी मात्र चुप्पी साधली.फक्त लवकरच प्राधिकरण गठित केले जाईल असे त्यांनी सांगितले. 3. कुंभमेळ्यासाठी निधीची प्रतीक्षा बैठकीत कुंभमेळ्याबाबत काेणत्याही निधीची घाेषणा करण्यात आली नाही. मात्र ६००० काेटींची कामे सुरू असून एकही रुपया कमी पडणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 4. नावाला विराेध : त्र्यंबकेश्वर- नाशिक अशी कुंभमेळ्याची ओळख करण्याची त्र्यंबकच्या आखाड्यांची मागणी पत्रकार परिषदेत फडणवीसांकडून जाणीवपूर्वक त्र्यंबकेश्वर-नाशिक सिंहस्थ अमृतपर्व असा उल्लेख करण्यात आला. 5. गाेदावरी प्रदूषणाबाबत साधू-महंतांकडून नाराजी गाेदावरी बारा महिने वाहती ठेवत प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न. राज्य सरकारने यासाठी प्लॅन ए व प्लॅन बी तयार केला आहे. तसेच एसटीपी प्लँटचे टेंडर मंजुरीस शासनाकडे आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
त्र्यंबक रोड विस्तारीकरण, गोदेवर ९ पुलांचे बांधकाम
त्र्यंबक रोडचे विस्तारीकरण, गोदावरीवर जवळपास नऊ पुलांचे बांधकाम तसेच जल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. रामकाल पथाचीही महत्त्वाकांक्षी योजना साकारण्यात येणार आहे.
गतवेळीपेक्षा निधीही तिपटीने मिळणार
नाशिकला गतवेळी २३७८ कोटींचा निधी मिळाला होता. या वेळी आताच ६ हजार कोटींच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रयागराजला या वेळी ४५ कोटी भाविक आले होते. ७५०० कोटी निधी मिळाला होता.






























