हैदराबाद खून: घरातून लाखोंचे दागिने चोरी आणि 50 वर्षीय महिलेच्या हत्या केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी दोन संशयित चोरांना अटक केली आहे. सायबराबाद येथे हा प्रकार घडला होता. पोलिसांनी झारखंडमधून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. एका विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेत कारवाई केली असून, पुढील तपासासाठी परत आणलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तीन दिवसांपूर्वी ही भयानक हत्या घडली, ज्यामध्ये पीडितेवर प्रथम प्रेशर कुकरने वार करण्यात आले, नंतर चाकू आणि कात्रीने तिचा गळा चिरण्यात आला. त्यानंतर संशयितांनी तिच्या घरातून लुटमार केली. धक्कादायक म्हणजे घऱात मृतदेह पडला असताना दोघेही आंघोळ करत होते. आंघोळ केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.
हत्या नेमकी कशी झाली?
50 वर्षीय रेणू अग्रवाल आयटी हब सायबराबादमधील अपार्टमेंटमधील त्यांच्या 13 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. गुन्हा घडला तेव्हा रेणू अग्रवाल यांचे पती आणि मुलगा कामावर होते. फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ते लवकर घरी परतले. मुख्य दरवाजा बंद असल्याने, त्यांनी प्लंबरच्या मदतीने बाल्कनीतून फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि धक्काच बसला. रेणू अग्रवाल मृतावस्थेत पडलेल्या होत्या.
पोलिसांनी सांगितलं की, पीडितेचे हातपाय बांधलेले होते आणि तिला प्रेस कुकरने मारहाण करण्यात आली होती. हल्लेखोरांनी चाकू आणि कात्रीने तिचा गळा चिरला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी सुमारे 40 ग्रॅम सोने आणि 1 लाख रुपये रोख घेऊन पळून गेले.
पळून जाण्यापूर्वी, दरोडेखोरांनी त्यांच्या घरात आंघोळ केली. त्यांनी कपडेही बदलले आणि त्यांचे रक्ताने माखलेले कपडे घटनास्थळी सोडून गेले असंही पोलिसांनी सांगितलं आहे. रेणू अग्रवाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे.
झारखंड कनेक्शन
प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना झारखंड कनेक्शन आढळले. दोघेही घरकाम करणारे, सीसीटीव्हीमध्ये 13 व्या मजल्यावर जाताना आणि संध्याकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी निघून जाताना दिसले. त्यापैकी एक अग्रवालच्या घरी काम करत होता, जो झारखंडचा होता आणि त्याला 10 दिवसांपूर्वीच एका एजन्सीने कामावर ठेवले होते, तर दुसरा पुढच्या मजल्यावर शेजारच्या घरात काम करत होता. दोघेही दुसऱ्या संशयिताच्या मालकाच्या दुचाकीवरून पळून जाताना दिसले होते. त्याच आधारे पोलिसांनी झारखंडमधून त्यांना अटक केली.
FAQ
1) हत्याकांड काय घडले?
हैदराबादमधील स्वान लेक अपार्टमेंटमध्ये १० सप्टेंबर २०२५ रोजी ५० वर्षीय रेणू अग्रवाल यांची क्रूर हत्या झाली. तिच्या घरात घुसलेल्या दोन संशयितांनी तिचे हात-पाय बांधले, प्रेशर कुकरने वारंवार मारहाण केली आणि चाकू व खासच्या सह गळा चिरला. हे घटना कुकाटपल्ली भागातील गेटेड कम्युनिटीमध्ये घडली. हत्येनंतर संशयितांनी घरातून सोने-चांदी व रोख रक्कम लुटली आणि तेथेच आंघोळ करून रक्ताने माखलेले कपडे सोडून पळून गेले.
2) पीडित कोण होती?
रेनू अग्रवाल या ५० वर्षीय महिलेला तिचा पती व २६ वर्षीय मुलगा यांच्यासोबत स्वान लेक अपार्टमेंटच्या १३व्या मजल्यावर राहत होते. तिचा पती व मुलगा सकाळी १० वाजता त्यांच्या स्टील व्यवसायासाठी घरी सोडले होते. रेणू एकटीच घरी होती तेव्हा हल्ला झाला. काही वेळा न लागल्याने कुटुंबीयांनी घरी परत येऊन तिचे मृतदेह आढळवले.
3) संशयित कोण आहेत आणि त्यांची अटक कशी झाली?
संशयितांचे नाव हर्ष (रेनू यांच्या घरी काम करणारा घरकरी) आणि रौशन (इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये काम करणारा) असे आहे. हे दोघेही कोलकाता येथील मॅनपॉवर एजंटद्वारे हैदराबादला पाठवले गेले होते. हत्येनंतर ते घटनास्थळापासून सुमारे ८ किमी अंतरावरील हाफेझपेट रेल्वे स्टेशनजवळ वाहन सोडून रानचीकडे पळून गेले. १२ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद पोलिसांनी रानची येथे दोघांची अटक केली. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करून हैदराबादला आणले जाणार आहे






























