Homeदेश-विदेशनेपाळ मोगल एम्पायर नेपाळ इतिहासावर मोगल का अपयशी ठरले हे आपणास माहित...

नेपाळ मोगल एम्पायर नेपाळ इतिहासावर मोगल का अपयशी ठरले हे आपणास माहित आहे काय?


नेपाळ इतिहास: राजकीय अस्थिरता, देशातील युवा वर्गाकडून सातत्यानं होणारी आंदोलनं आणि या आंदोलनांना मिळालेल्या हिंसक वळणानंतर आता कुठे नेपाळमधील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. देशात बेरोजगारी वाढत असून नागरिक आणि लष्करामध्ये समन्वय साधणारं सरकार सत्तेत असावं या मागणीसद देशातून राजेशाहीनं माघार घ्यावी ही मागणी नेपाळमध्ये मागील काही दिवसांमध्ये जोर धरताना दिसली. असा हा देश एकाएकी जागतिक पटलावर चर्चेचा विषय ठरला.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

भूतकाळात डोकावताना…

नेपाळच्या भूतकाळात डोकावलं असता त्याचा रक्तरंजित इतिहासही हादरवून सोडतो. अशा या देशाच्या बाबतीच एक गोष्ट मात्र अतिशय अनपेक्षित. ती म्हणजे 300 वर्षांहून अधिक काळासाठी भारतासारख्या विशाल भूमीवर राज्य करणाऱ्या मुघलांना कधीच नेपाळची भूमी पूर्णपणे अधिपत्याखाली आणता आली नाही.

मुघलांना का जिंकता आलं नाही नेपाळ?

16व्या ते 18व्या शतकापर्यंत भारतीय उपमहाद्वीपावर मुघलांचं वर्चस्व होतं. बाबरपासून औरंगजेबापर्यंत मुघल शासकांचा प्रभाव बंगाल, पंजाब, दख्खन आणि अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पाहायला मिळाला. तरीही नेपाळ त्यांच्या आटोक्यात येत नव्हतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं नेपाळची भौगोलिक स्थिती.

उंचच उंच पर्वतरांगा, खोर आणि तितकीच जीवघेणी दरीखोरी, घनदाट वनराई यांमुळं नेपाळला नैसर्गिकरित्या एक सुरक्षा कवच लाभलं होतं. अतिप्रचंड मोठ्या तोफा आणि घोडदळावर अवलंबून असणारी मुघल सेना या पर्वतीय क्षेत्रात मात्र युद्धात कमकुवत पडत होती.

मुघलांचं प्राधान्य आणि लक्ष दुसरीकडेच…

मुघलांनी सर्वाधिक प्राधान्य बहुतांशी मैदानी आणि सुपिक क्षेत्रांना देत तिथं आक्रमणं केली. गंगा आणि यमुनेचं खोरं, त्यानजीकचा परिसर, बंगाल आणि गुजरात अशी ठिकाणं त्यांच्यासाठी व्यापारवृद्धी आणि आर्थिक सुबत्तेचे स्त्रोत होते. त्या तुलनेत नेपाळमध्ये पिकांचं मर्यादित प्रमाण आणि आव्हानात्मक भौगोलिक रचना त्यांच्यासाठी या भागाला कमी प्राधान्य देण्याच्या कारणांमध्ये भर पाडत होती.

मुघलकालीन वर्षांमध्ये नेपाळ अनेक लहान भागांमध्ये विभागला होता. ज्यामध्ये काठमांडू, भक्तपूर, ललितपूर यांचा समावेश होता. या राज्यांमध्ये परस्पर विरोध असला तरीही बाह्य आक्रमणांच्या वेळी मात्र ते एकजुटीनं प्रतिकार करण्यास सक्षम होते आणि याच एकीनं त्यांना मुघलांविरोधात लढण्याचं बळ दिलं. त्यातच नेपाळ हा भारत आणि तिबेटदरम्यानचा व्यापारी सेतू होता. जिथून लोकर, मीठ, मसाले, धातू अशा वस्तूंची देवाणघेवाण केली जात होती. ज्या कारणास्तव मुघलांनी नेपाळशी संघर्षाऐवजी व्यापारी संबंध टिकवण्यावर भर दिला.

लष्करी आव्हानं…

नेपाळमधील गुरखा योद्धे पर्वतीय युद्धशैलीमध्ये निपुण होते. त्या तुलनेत मुघल सैन्याकडे मैदानी लढायांचा अनुभव होता. ज्या कारणास्तव त्यांना पर्वतांमध्ये सातत्यानं अपयशाचा सामना करावा लागत होता. ज्या कारणामुळं नेपाळवर मुघलांनी चढाई करण्याचा पर्याय पाहिला नाही. उत्तर पश्चिमेकडून असणारा अफगाण आणि ईराण्यांचा धोका, दक्षिणेत सुरू असणारा मराठ्यांसोबतचा संघर्ष आणि पूर्वेत आसाम बंगालमधील आव्हानांमध्ये मुघलांना बराच फौजफाटा तैनात करावा लागत असल्यानं त्यांनी नेपाळकडे दृष्टीक्षेपही कमीच टाकला आणि या भूमीवर त्यांना अधिपत्य मिळवता आलं नाही.

FAQ

नेपाळमध्ये सध्या काय राजकीय संकट आहे?
2025 मध्ये Gen-Z तरुणांच्या आंदोलनाने भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवरून हिंसा भडकावली. पंतप्रधान ओलींनी राजीनामा दिला, 30 हून अधिक मृत्यू झाले, आणि लष्कराने नियंत्रण घेतलं. आंदोलक अंतरिम सरकारची मागणी करत आहेत.

मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?
मुख्य कारणं भौगोलिक कठीणता (हिमालय), आर्थिक फायदा नसणे, व्यापारी मार्ग टिकवणे आणि गुरखा योद्ध्यांची शक्ती. मुघल मैदानी प्रदेशांना प्राधान्य देत.

नेपाळमध्ये गुरखा योद्ध्यांची भूमिका काय होती?
गुरखा पर्वतीय युद्धशैलीत निपुण होते. मुघल आणि ब्रिटिशांना त्यांचा पराभव करणं कठीण गेलं, ज्यामुळे नेपाळ स्वतंत्र राहिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:3 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले, 1 बेपत्ता

0
अमेरिकेच्या नौदलाच्या MH-60S सीहॉक हेलिकॉप्टरने बुधवारी अरबी समुद्रात आपत्कालीन जल-लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील चार क्रू सदस्यांपैकी तिघांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर एक जण अजूनही...
spot_img

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

20% कपात ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यांचे आश्वासन

0
मराठी बातम्याव्यवसायभारतातील वायू प्रदूषणात कपात: 20% कमी करण्याचे आश्वासन ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यानवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी करादेशातील हवा जेवढी...
error: Content is protected !!