नोएडा एक्सप्रेसवे रेन ट्रॅफिक जाम: भारतातील सर्वात महाभयानक ट्रॅफिक जाम देशाची राजधानी दिल्लीत पहायला मिळाला. 20 Km लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सात ते आठ तास लोक या वाहतूक कोंडीत अडकले होते. रात्री ऑफिसमधून निघालेले लोक सकाळी घरी पोहचले. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर ही भयानक वाहतूक कोंडी पहायला मिळाली.
दिल्ली-एनसीआरमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गुरुग्राममध्ये हजारो मोठी वाहतूक कोंडी झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोमवारप्रमाणे मंगळवारीही अधूनमधून पाऊस सुरूच राहिला. परिणामी, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. हजारो लोक या ट्रॅफिक जाममध्ये अडकले.
गर्दीच्या वेळेस ही वाहतूक कोंडी झाली. संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नोएडा एक्सप्रेस वेवर प्रवास करण्यासाठी साधारणतः 30 मिनिटे लागायची, परंतु पावसामुळे पाणी साचल्याने आणि वाहनांची वाढलेली वाहतूक यामुळे प्रवासी 6 ते 8 तासांपर्यंत वाहतूक कोंडीत अडकले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आम्ही रात्री ऑफिसमधून निघालेले आहोत सकाळ पर्यंत धरी पोहचू अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.
लोकांना मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तासन्तास लागले यावरून जामची स्थिती किती वाईट आहे याचा अंदाज लावता येतो. सध्या नोएडा पोलिस एक्स वर पोस्ट करत आहेत की जामची परिस्थिती आता सामान्य आहे. गुरुग्राममध्ये अनेक किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामध्ये हजारो वाहने अनेक तास अडकून पडली होती. जाममधून बाहेर पडल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दिल्लीतील अनेक भागातही गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते.
FAQ
1. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीचे मुख्य कारण काय होते?
मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली.
2. वाहतूक कोंडी किती गंभीर होती?
वाहतूक कोंडी इतकी गंभीर होती की 20 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना 6 ते 8 तास अडकून राहावे लागले, ज्यामुळे साधारण 30 मिनिटांचा प्रवास तासांपर्यंत लांबला.
3. ही वाहतूक कोंडी कधी झाली?
ही वाहतूक कोंडी सोमवार आणि मंगळवार, 1 आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पावसानंतर झाली, विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी जेव्हा लोक ऑफिसमधून घरी निघाले होते.































