Homeमनोरंजनक्वालिफायर 2 मधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सवर भडकले रोहितचे फॅन्स, ट्रोल होतोय हार्दिक...

क्वालिफायर 2 मधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सवर भडकले रोहितचे फॅन्स, ट्रोल होतोय हार्दिक पंड्या


आयपीएल 2025: आयपीएल 2025 मध्ये रविवार 1 जून रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स त्यांच्यात क्वालिफायर 2 सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईचा 5 विकेट आणि 1 ओव्हर राखून पराभव केला आणि यासह ते फायनलमध्ये पोहोचले आहेत. 3 जून रोजी आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात फायनल सामना पार पडेल. क्वालिफायर 2 सामन्यातील पराभवामुळे 2020 च्यानंतर पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं मुंबई इंडियन्सचं स्वप्न धुळीस मिळालं. या पराभवानंतर काही फॅन्स मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी आणि हार्दिक पंड्याला ट्रोल करत आहेत.

6 व्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं :

आयपीएलला यंदा तीन वर्षानंतर नवा विजेता मिळणार आहे. 2022 मध्ये गुजरात टायटन्सने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ट्रॉफी जिंकली होती. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यंदा 6 व्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मुंबई इंडियन्सचं होतं मात्र पंजाब किंग्सने मुंबईची वाट अडवली आणि क्वालिफायर 2 मध्ये पराभूत करून मुंबईला थेट स्पर्धेच्या बाहेर पोहोचवलं. मागच्यावर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला करून हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. ज्यावरून हार्दिक आणि फ्रेंचायझीला मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा याची चर्चा होऊ लागली आहे.

मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्याला केलं ट्रोल :

क्वालिफायर 2 सामन्यातील अनेक निर्णयांमुळे हार्दिक पंड्यावर रोहित शर्माचे फॅन्स नाराज दिसत आहेत. फॅन्सचं म्हणणं आहे की, रोहित शर्मा हा हार्दिक पेक्षा चांगला कर्णधार आहे. त्याचीही जागा कोणीही घेऊ शकत नाही. फॅन्सचं म्हणणं आहे की जर रोहित शर्मा कर्णधार असता तर मुंबई इंडियन्सवर 200 धावा करूनही पराभूत होण्याची वेळ आली नसती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स 200 हुन अधिक धावा करून सुद्धा पराभूत झाली.

हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह :

हार्दिक पंड्या हा 2023 पर्यंत गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. 2024 च्या आयपीएलपूर्वी त्याला ट्रेड करून मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आले.  आयपीएल 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वात मुंबईचा परफॉर्मन्स फार वाईट होता आणि त्यांना 14 लीग स्टेज सामन्यापैकी केवळ 4 सामने जिंकण्यास यश मिळाले होते. यानंतर, हार्दिकने टी -20  वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवून टीम इंडियाला चॅम्पियन बनविले. त्यानंतर चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली.  मात्र आता क्वालिफायर 2 मध्ये झालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!