Homeमनोरंजनभारत पाकिस्तान युद्धावरील वीरेंद्र सेहवाग त्यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आणि सांगितले की...

भारत पाकिस्तान युद्धावरील वीरेंद्र सेहवाग त्यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आणि सांगितले की आमची शक्ती सर्वात योग्य पद्धतीने उत्तर देईल


वीरेंद्र सेहावाग: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मू सह भारताच्या विविध शहरांमध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. त्यांनी पठाणकोटच्या एअरबेसवर सुद्धा अटॅक केला. पाकिस्तानी सैन्याच्या निशाण्यावर भारतीय सैन्याचे बेस होते. त्यानंतर भारताने एअर डिफेन्स सिस्टम S400 ला ऍक्टिव्ह करून पाकिस्तानचे 8 मिसाईल आणि अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारत – पाकिस्तान युद्ध सुरु असताना भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विट करत म्हंटले की, ‘पाकिस्तानला शांत राहण्याची संधी असताना त्यांनी युद्ध निवडले आहे. ते त्यांच्या दहशतवादी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढे आले होते, आणि त्यांच्याबद्दल खूप काही बोलत होते. आपले सैन्य सर्वात योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देईल, अशी पद्धत जी पाकिस्तान कधीही विसरणार नाही’.

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांवर हल्ले केले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं आणि त्यांना उध्वस्त केलं. ज्यात लश्कर-ए-तैयबा आणि जैश- ए- मोहम्मद यांच्या दहशतवादी टाळ्यांचा तळांचा सुद्धा सहभाग होता.

हेही वाचा : भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! आज होणार होती PSL ची मॅच

8 मे च्या पहाटे ऑपरेशन सिंदूरचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानने भारताच्या 4 राज्यांमधील 15 शहरांवर मात्र हे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावले. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. भारतीय सशस्त्र दलांनी 8 मे च्या सकाळी पाकिस्तानमधील लाहोर सह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केली. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं. यानंतर सुद्धा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानला उद्देशून ट्विट केलं. त्यांनी म्हंटले की, ‘जर कोणी तुमच्यावर दगड फेकत असेल तर तुम्ही त्याच्यावर फुल टाका पण कुंड्यांसकट. जय हिंद!’ .  तसेच अजून एक ट्विट करत त्याने ‘धर्मो रक्षति रक्षत: जय हिंद की सेना’ असं देखील लिहिलं. वीरेंद्र सेहवागच्या या ट्विटवर नेटकरी विविध प्रक्रिया देत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!