Homeमहाराष्ट्रचेहऱ्यावर निराशा,हताश नजरा; भारत सोडवेना! दहशतवाद्यांच्या पापाची शिक्षा भोगतायत पाकिस्तानी

चेहऱ्यावर निराशा,हताश नजरा; भारत सोडवेना! दहशतवाद्यांच्या पापाची शिक्षा भोगतायत पाकिस्तानी


भारतात पाकिस्तानी नागरिक: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र यामुळं ज्यांचे नातेवाईक भारतात आहेत अशा पाकिस्तानी नागरिकांची मोठी अडचण झालीय. त्यांची काय अवस्था झालीय. चेहऱ्यावर निराशा.. हताश नजरा. भारत सोडावा लागत असल्याचा डोळ्यात दिसणारा चलबिचलपणा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या कठोर भूमिकेंनतरची ही दृश्य. पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळं लग्नकार्य, वैद्यकीय उपचार किंवा नातलगांना भेटायला आलेल्या अनेकांना अचानक भारत सोडून पाकिस्तनात जावं लागतंय.

विवाहीत जोडप्यांना वेगळं न करण्याची विनंती

पंजाबच्या अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात परतणारी समरीन मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 45 दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली. इथं तिचं रिझवानसोबत लग्न झालं. ती गरोदरही राहिली. तिला अजून दीर्घकालीन व्हिसा मिळालेला नाही. त्यात आता तिला अचानक देश सोडून पाकिस्तानला परत जायला सांगितलं गेलंय. सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना टुरिस्ट व्हिसा रद्द करावा मात्र भारताशी नातं जोडलेल्या कुटुंबांना तोडू नये अशी विनंती तिनं केंद्र सरकरला केलीय. समरीनचे पती रिझवान यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. मात्र या सगळ्यात किमान विवाहीत जोडप्यांना वेगळं करु नये अशी विनंती त्यांनी सरकारला केलीय.

https://www.youtube.com/watch?v=1v5ie3opcc0

पुन्हा जावं लागणार सासरी

दुसरीकडे राजस्थानच्या जोधपूर शहरातील महिलेची वेगळीच कथा आहे. तिचं लग्न पाकिस्तानात झालंय. ती माहेरी आली होती. मात्र आता तिला वेळेआधीच पाकिस्तानला परत जावं लागतंय. गुन्हेगारांना शिक्षा जरुर व्हावी मात्र सामान्य लोकांना नको अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट

तिसरी गोष्ट आहे एका आईची. या भारतीय महिलेचं 10 वर्षापूर्वी पाकिस्तानात लग्न झालं. तिच्या दोन्ही मुलांचा जन्म भारतात झाला, मात्र मुलांकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. आपण आपल्या मुलांसोबत पाकिस्तानात जाऊ शकत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात परतणारे पाकिस्तानी नागरिक कृष्ण कुमार यांनीही सरकारला विनंती केलीय. आपण टुरिस्ट व्हिसावर 45 दिवसांसाठी भारतात आलो.. मात्र दहशतवादी हल्ल्यानं दोन देश वेगळे केले. दोन्ही देशांनी एकत्र राहावं कारण अर्धी कुटुंबे पाकिस्तानात आहेत अर्धी भारतात. त्यामुळे त्यांची ताटातूनट होऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं दोन धर्म, दोन देशात पुन्हा कटुता आलीय. मात्र याची झळ दोन्ही देशात कुटुंब असलेल्या अनेक कुटुंबांनाही बसतेय. भारतात येऊन दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी हीदेखिल दृश्य बघावी. दहशतवाद्यांनी केलेल्या पापाची फळं सध्या अनेक पाकिस्तानींना भोगावी लागताहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला:ज्या हरियाणवी वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले,...

0
NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप...

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

0
अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे...

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे...

0
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात...

daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...
spot_img

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...

0
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...
error: Content is protected !!