Homeदेश-विदेशरजनीकांत त्याच्या आणि जे जयललिता यांच्यात लांब अफवा पसरविण्यामागील कारण प्रकट करते

रजनीकांत त्याच्या आणि जे जयललिता यांच्यात लांब अफवा पसरविण्यामागील कारण प्रकट करते

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर अखेर भाष्य केलं आहेत. दिवंगत नेत्या आणि चित्रपट निर्माते आर.एम. वीरप्पन यांच्याशी संबंधित एका घटनेमुळे त्यांच्या नात्याला वळण मिळालं असा खुलासा त्यांनी केला आहे.

आर एम वीरप्पन यांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंट्रीत रजनीकांत यांनी जयललिता यांनी केलेल्या वादग्रस्त सार्वजनिक टिप्पणीनंतर आरएम वीरप्पन यांना त्यांच्या मंत्रिपदावरून कसे काढून टाकले ते सांगितलं. हा कार्यक्रम वीरप्पन यांची निर्मिती कंपनी असलेल्या सत्य मूव्हीजने निर्मित ‘बाशा’ या चित्रपटाच्या 100 व्या दिवसाच्या समारंभादरम्यान घडला.

रजनीकांत यांनी ‘बॉम्ब कल्चर’वर केलं होतं भाष्य

रजनीकांत यांनी सभेला संबोधित करताना तामिळनाडूमध्ये “बॉम्ब संस्कृती” वाढत असल्याबद्दल इशारा दिला आणि चिंता व्यक्त केली की ही प्रवृत्ती राज्याला “स्मशानभूमी” बनवू शकते. त्यावेळी जयललिता वीरप्पन यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होत्या. रजनीकांत यांच्या मते, त्यांच्या वक्तव्यामुळे वीरप्पन यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. या निर्णयामुळे रजनीकांत यांना खूप वाईट वाटलं होतं.

रजनीकांत म्हणाले की, त्यांना त्या रात्री झोप लागली नाही. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी वीरप्पन यांच्याशी संपर्क साधून खेद व्यक्त केला. तथापि, ज्येष्ठ नेत्याने विनम्रतेने उत्तर दिलं आणि रजनीकांत यांना काळजी न करता नेहमीप्रमाणे काम सुरू ठेवण्यास सांगितलं. जेव्हा रजनीकांत यांनी जयललिता यांच्याशी बोलून याप्रकरणी स्पष्टता करावी का? अशी विचारणा केली असता वीरप्पन यांनी तसं न करण्याचा सल्ला दिल. त्यांनी म्हटले की, “तुमचा स्वाभिमान गमावू नका. मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी त्याच्याशी संलग्न नाही.”

तो क्षण आठवताना रजनीकांत भावूक झाले. त्यांनी आरएम वीरप्पन “खरा किंगमेकर” असल्याचं म्हटलं आणि जयललिता यांच्या राजकीय विरोधामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणून या घटनेचा उल्लेख केला. “मी त्यांच्याविरोधात का उभा राहिलो याचे हे एक प्रमुख कारण आहे,” असं रजनीकांत यांनी डॉक्यूमेंट्रीत म्हटलं आहे.

रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील वाद

1990 च्या दशकातही रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील मतभेदाच्या बातम्या प्रसिद्द झाल्या होत्या. विशेषतः जयललिता यांनी रजनीकांत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि काळ्या पैशांसंबंधी प्रत्युत्तरात, रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये रजनीकांत यांनी नेत्यांना राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव शस्त्र म्हणून वापरू नका किंवा त्यांच्या चाहत्यांमध्ये फूट पाडू नका असं आवाहन केलं होतं.

आरएमव्ही म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे आरएम वीरप्पन हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते तर तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख शक्ती होते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. रजनीकांत यांच्याशी त्यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय होती.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय म्हणाले-पॅलेट गनच्या वापरावर सध्या बंदी नाही:पोलिसांना विशेष परिस्थितीत वापरण्याचा अधिकार; सरकारकडून वापरासाठी...

0
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पॅलेट गनच्या वापरास सध्या बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, पोलीस विशेष परिस्थितीत पॅलेट गनचा वापर करू शकतात....

तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!

0
मराठी बातम्याराष्ट्रीयतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करामेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६...

गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट

0
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
spot_img

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...
error: Content is protected !!