Homeपुणे / पिंपरी-चिंचवडपाठपुराव्याला यश; पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी! ; केंद्रीय मंत्री मोहोळ यांची...

पाठपुराव्याला यश; पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी! ; केंद्रीय मंत्री मोहोळ यांची माहिती

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारकडून अखेर मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे पुण्याच्या पूर्व-पश्चिम भागांना आता जलद आणि आधुनिक मेट्रोसेवेची जोड मिळणार आहे.

वनाज-चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी-वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन नवे मेट्रो मार्ग या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. एकूण १२.७५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात १३ स्थानकं असतील, जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली या भागांना थेट मेट्रोशी जोडणार आहेत.

मोहोळ यांनी सांगितले की, “या मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.” तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानले.

या नव्या मार्गांमुळे वनाज-रामवाडी या विद्यमान मेट्रो मार्गाचे प्रभावीपणे विस्तारीकरण होणार आहे. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक हे या दोन्ही नवीन कॉरिडॉर्ससाठी इंटरचेंज पॉइंट असणार आहे, जिथे Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी थेट जोड मिळेल.

या प्रकल्पामुळे IT हब, शैक्षणिक संस्था, रहिवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील नागरिकांसाठी मेट्रो हा सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे, चांदणी चौक व वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांतून येणाऱ्या प्रवाशांना मेट्रोची थेट जोड मिळणार आहे.

₹३,६२६.२४ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी महा-मेट्रोमार्फत होणार असून, पुढील चार वर्षांत तो पूर्ण केला जाणार आहे. पुणे शहरासाठी स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रणाली उभारण्याच्या दिशेने ही एक महत्त्वाची झेप ठरणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!