Homeपुणे / पिंपरी-चिंचवडचिखली-चऱ्होली नगररचना योजनेच्या विरोधात आंदोलन

चिखली-चऱ्होली नगररचना योजनेच्या विरोधात आंदोलन


पिंपरी : अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली-चऱ्होलीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या नियोजनाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. अंधारात ठेवून ही योजना लादली जात असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सोमवारी या योजनेच्या जाहीर प्रकटन कागदपत्रांची होळी केली.कुदळवाडी, चिखली आणि जाधववाडी परिसरामध्ये अनधिकृत पत्राशेड, भंगार गोदामे, लघुउद्योग उभारले होते. भंगार व्यावसायिकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या भागात बांगलादेशी, रोहिंगे असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेने ८२५ एकर क्षेत्रफळावरील अनधिकृत भंगार गोदामे, दुकानांवर कारवाई करण्यात आली. आता महापालिकेने चिखली, कुदळवाडी, चऱ्होलीत नगररचना योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. चिखलीमधील ३८० हेक्टर, चऱ्हाेलीतील एक हजार ४२५ हेक्टरवर आराखडा तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, या योजनेच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, योजनेला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी कुदळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक झाली. त्यामध्ये जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, बाळासाहेब यादव, उदय पाटील, दिलीप यादव, रमेश मोरे, दत्तू मोरे, शैलेश मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून योजनेच्या जाहीर प्रकटनाची होळी करण्यात आली.

चिखली, कुदळवाडीच्या जमिनी तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या. महापालिकेच्या आरक्षणातही मोठे क्षेत्रफळ गेले आहे. घरकुलासाठी शंभर एकर क्षेत्र घेतले. यापूर्वीच या भागातील रस्त्यांसाठी देखील जमीन संपादित करण्यात आली. आता नगररचना योजनेसाठी पुन्हा एकदा स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रशासनाच्या हालचाली असल्याचे दिनेश यादव म्हणाले.

हेही वाचा

आव्हानांना सामोरे जात यशाला गवसणी; कचरावेचक, रात्रशाळांतील, अंध विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली आणि चऱ्होलीसाठी नगररचना योजना जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या योजनेला विरोध आहे. भूमिपुत्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता प्रशासन अशी योजना राबवू शकत नाही.या योजनेला तत्काळ स्थगिती देण्यात यावी.- महेश लांडगे, आमदार, भोसरी



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!