राज्यातील एसटी बस स्थानकांमधील महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या गंभीर गैरसोयींवर शिवसेनेच्या महिला आघाडीने थेट आवाज उठवला आहे. आपल्याच पक्षातील राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्याशी संबंधित या प्रश्नाव
?
शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली २० जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ८७ बस स्थानकांची पाहणी करण्यात आली. यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात स्थानकांतील गैरसोयींवर तीव्र प्रकाश टाकण्यात आला आहे. पाहणीत अनेक ठिकाणी महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी अत्यंत असुविधा असल्याचे स्पष्ट झाले. बस स्थानकांमधील परिस्थिती तातडीने सुधारण्यात यावी असे महिला आघाडीने अहवाल म्हटले आहे. विशेष म्हणजे, ही पाहणी आणि अहवाल पक्षातीलच मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या खात्याला उद्देशून सादर करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून ‘घरचा आहेर’ देत दिला आहे.
या आहेत गैरसोयी महिला व कर्मचाऱ्यांसाठी अस्वच्छ शौचालये असून हिरकणी कक्षांची कमतरता आहे. दिव्यांगांसाठी रॅम्प व रेलिंगचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याचा अभावही आहे. अपुरा लाइट, सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे. अवैध वाहतूक व दलालांची वाढती वर्दळ आहे.सीसीटीव्ही यंत्रणांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.





























