Homeपुणे / पिंपरी-चिंचवड‘जेन स्ट्रीट’वरील बंदी उठली! बाजार नियामक ‘सेबी’ कडून पुन्हा व्यापारास परवानगी?

‘जेन स्ट्रीट’वरील बंदी उठली! बाजार नियामक ‘सेबी’ कडून पुन्हा व्यापारास परवानगी?


नवी दिल्ली ः बेकायदेशीर व्यवहारांचा आरोप असलेली अमेरिकी संस्था जेन स्ट्रीटने ४८४३.५७ कोटी रुपयांचा दंड जमा केल्यानंतर बाजार नियामक ‘सेबी’ने तिच्या बाजारातील व्यवहारांवर पायबंद घालणारे निर्बंधही उठविले असल्याचे या प्रकरणातील माहितगार दोन सूत्रांनी सोमवारी सूचित केले.
जेन स्ट्रीटने सरलेल्या मंगळवारी ‘सेबी’च्या नावे विशेष खात्यात ४,८४३.५७ कोटी रुपयांची रक्कम जमा करताना, बाजार नियामकांनी लादलेले निर्बंध उठविण्याचीही विनवणी केली होती.

योग्य त्या प्रक्रियेनुसार चाचपणी करून या विनंतीची दखल घेतली जाईल, असे सेबीने त्यावर सत्वर उत्तरही दिले होते. त्यानंतर नियामकांकडून शुक्रवारी जेन स्ट्रीलला एक ईमेल संदेश पाठविण्यात आला. ज्यामध्ये दंडाची रक्कम जमा केल्यानंतर अंतरिम आदेशातून लादले गेलेले निर्बंधही आता गैरलागू ठरले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले.

सेबीने ३ जुलै रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशात, भारतीय बाजारात रोख्यांची खरेदी आणि विक्री करण्यास जेन स्ट्रीट समूहातील चार कंपन्यांवर बंदी घातली गेली होती. शिवाय बेकायदेशीरपणे कमावलेल्या नफ्याच्या उलटवसुली म्हणून दंडापोटी ४,८४३.५७ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे चौकशी पूर्ण होईपर्यंत नियामकांच्या विशेष खात्यात समतुल्य रक्कम जमा केल्यास जेन स्ट्रीट नित्य व्यापार पुन्हा सुरू करू शकते, असे आदेशात म्हटले होते. त्यानुरूप आता जेन स्ट्रीटला व्यापार सुरू करण्यास परवानगीही दिली गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

हेही वाचा

तथापि जेन स्ट्रीट आणि सेबी, दोहोंकडून याची पुष्ठी करण्यासाठी पाठवलेल्या ईमेल प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळू शकलेली नाहीत, असे वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे. एनसई लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड या दोन्ही प्रमुख बाजारमंचांनाही या अमेरिकी संस्थेच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. जरी जेन स्ट्रीटला बाजारात पुन्हा व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी ती ‘ऑप्शन्स’मध्ये व्यापार करणार नाही, असे तिने सेबीला आश्वासन दिले आहे. जोपर्यंत सेबीला व्यवहारनीती स्पष्ट केली जात नाही, तोपर्यंत रोखीने (कॅश मार्केट) देखील व्यापार करण्याचा जेन स्ट्रीटचा विचार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!