वैजापूरला दोन महिन्यांपासून रुग्णवाहिकेवर चालक नाही. लाडसावंगीतील एक महिन्यापासून डॉक्टर रजेवर आहेत. कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसतानाही त्यांना पगार देण्यात आल्याचा आरोप राधाकिशन पठाडे यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘त्यांना वर्क फ्रॉम होम’ (ऑनलाइन काम) दिले होते, असे उत्तर देताच सभागृह चांगलेच तापले. आरोग्य सेवा वर्क फ्रॉम होमने चालते का? असा सवाल सदस्यांनी विचारला. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याचा मुद्दा सदस्य संजय निकम यांनी मांडला. तीन-चार स्तरांची एवढी मोठी यंत्रणा हाताशी असूनही एका साध्या प्रकरणाचा अहवाल द्यायला महिना कसा लागतो? तुम्ही स्वतः काम करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही, अशा शब्दांत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांना धारेवर धरले. लाडसावंगी आरोग्य केंद्राच्या बोगस वेतन प्रकरणाचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे आदेश अध्यक्ष अविनाश गलांडे, सीईओ मिन्नू पी. एम. यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी वेरुळ सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, सभापती सचिन गरड, बालाजी सोनटक्के, मीनाक्षी पवार, सीईओ मिन्नू पी.एम., अतिरिक्त सीईओ वासुदेव सोळंके आदी उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या भाडेतत्त्वावरील वाहनांच्या धावमर्यादा वाढीचा विषय आला असता, सदस्य पंकज ठोंबरे यांनी डिझेल गाड्यांऐवजी ‘ईव्ही’ गाड्या घेण्याची आग्रही मागणी केली. यामुळे जि.प.चे पैसे वाचतील आणि संस्थेची कायमस्वरूपी मालमत्ता तयार होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर अध्यक्ष गलांडे यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये सदस्यांनी सर्वसाधारण सभेसारखेच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रत्येकाला पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांवर आपली छाप पाडायची होती. यातील अनेक सदस्यांनी अधिकाऱ्यांना माहिती मागितली. मात्र अधिकारी अद्याप प्रशासक राजमधून बाहेर आलेले नसल्याने त्यांनी सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे दिसून आले. यामुळे हा संताप बैठकीत पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांनो चुका मान्य करायला शिका : अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले मात्र अधिकारी त्यांचे बरोबर असल्याचे सांगत होते. अधिकाऱ्यांनी कामात त्यांच्याकडून झालेल्या चुका मान्य करून पुढे व्यवस्थित काम करायला शिकावे, असा सल्ला अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी दिला. बांधकामाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी सुचना केली. अधिकारी मोडवर म्हणून सदस्य अॅक्शन मोडवर
Source link
लाडसावंगी आरोग्य केंद्राच्या बोगस वेतनाचा अहवाल द्या:जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नुतन सदस्यांनी आरोग्य विभागाला धरले धारेवर
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























