Homeपुणे / पिंपरी-चिंचवडशहरबात: तुकडेबंदीचे ‘साधक’ आणि ‘बाधक’

शहरबात: तुकडेबंदीचे ‘साधक’ आणि ‘बाधक’


सुजित तांबडे
विधानसभा निवडणुकांना ‘लाडक्या बहिणी’ धावून आल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा रद्द करून शहरातील मध्यमवर्ग आणि ग्रामीण भागातील मतदारांना सत्ताधारी पक्षांनी खूश केेले आहे. या निर्णयामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) एक गुंठ्यापर्यंतच्या जमिनींची खरेदी-विक्री होणार आहे. त्यामुळे जमीन असूनही ती विकता किंवा विकसित करता येत नसलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, ही चांगली बाब म्हणावी लागेल. मात्र, निवडणुकीत मतांचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवून खेळलेली ही ‘साधक’ खेळी भविष्यातील पुण्याच्या नियोजनाला ‘बाधक’ होऊ नये, यासाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागणार आहेत.

तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची गरज होती का? तर नक्कीच होती. या कायद्यामुळे कमी क्षेत्रफळ असलेल्या जागेची खरेदी-विक्री होत नसल्याने नागरिकांची अडचण झाली होती. त्यामुळे अशा जमिनींचे बेकायदा व्यवहार व्हायचे. हे सर्व प्रकार आता बंद होणार आहेत. आता एक गुंठा जमिनीचीही खरेदी- विक्री होणार असल्याने नागरिकांना आपल्या हक्काची जमीन मिळणार आहे. हा निर्णय ‘पीएमआरडीए’च्या हद्दीसाठी लागू असल्याने पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरावर या निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार आहे.

अगोदर या निर्णयाच्या साधक बाजूचा विचार करू. तुकडेबंदी कायद्यानुसार पुणे जिल्ह्यात बागायत जमिनीसाठी १० गुंठे, तर जिरायत जमिनीसाठी २० गुंठे क्षेत्रफळाची मर्यादा होती. त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असल्यास या जमिनीच्या खरेदी- विक्रीचा व्यवहार होत नसे. आता हा कायदा रद्द झाल्यामुळे हे बंधन असणार नाही. तुकडेबंदीच्या कायद्यामुळे अनेकजण त्यातून पळवाटा काढत होते. काहीजण एकत्र येऊन दहा गुंठे किंवा २० गुंठ्यांची जमीन खरेदी करत होते. मात्र, सात-बारा उताऱ्यामध्ये सर्वांची नावे असल्याने एका व्यक्तीला जमीन विकता येत नव्हती. त्यामुळे अनेकांच्या जमिनीची प्रकरणे ही प्रलंबित होती. ही प्रकरणे आता मार्गी लागणार आहेत. लहान भूखंडांना आता किंमत नव्हती. या निर्णयाने जमिनींना सोन्याचे भाव येणार आहेत.

हेही वाचा

मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी ‘क्रीडा नर्सरी’

या निर्णयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे जिल्ह्याच्या परिसरात गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळणार आहे. लहान आकाराचे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतील. लहान भूखंडांवर नागरिकांना स्वप्नातले घर बांधता येणार आहे. एवढेच नव्हे, तर लहान भूखंड एकत्र करून (क्लस्टर) मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारणे शक्य होणार आहे. लहान भूखंडांवर बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. आता लहान भूखंड हे तारण म्हणून ठेवून नागरिकांना तातडीची गरज भागवता येणार आहे.
नागरिकांच्या फायद्यांबरोबरच सरकारच्या तिजोरीतही आता करोडो रुपयांची भर पडणार आहे. लहान भूखंंडांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढल्यामुळे राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून महसूल उपलब्ध होणार आहे.

आता या निर्णयाच्या संभाव्य बाधक गोष्टींचा विचार करू. सर्वांत मोठा परिणाम हा शहराच्या नियोजनावर होण्याची शक्यता आहे. जमिनीचे अनियंत्रित विभाजन होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभूत सुविधा पुरविताना दमछाक होणार आहे. लहान भूखंडावर प्रत्येकजण हवे तसे बांधकाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियम केले, तरी त्यातून पळवाटा काढून बांधकामे होत राहतील. त्यातून बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट होऊ शकतो. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण येऊन पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचे काम जिकिरीचे होणार आहे. लहान भूखंडांवर बेकायदा बांधकाम झाल्यास रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडू शकते.

हेही वाचा

आवाजाच्या मर्यादेचे बंधन पाळण्यावरच भर; ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांची भूमिका

सर्वांत मोठा धोका हा अनधिकृत बांंधकामांमुळे झोपडपट्ट्यांची वाढ झाल्यास शहराचा चेहरा बदलून जाईल. लहान भूखंड हे आतापर्यंत नागरिकांच्या आवाक्यात होते. त्यांचे भाव कडाडणार असल्याने जमिनीच्या किमती अवाजवी वाढणार आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे घराचे स्वप्न दूरच राहू शकते.

राज्य सरकार आता यापूर्वी झालेली लहान भूखंडावरील बांधकामे नियमित करण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करणार आहे. त्यामुळे पूर्वीची बांधकामे नियमित होतील. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून साधक-बाधक परिणामांचा विचार केला जाणारच आहे. लोकप्रतिनिधींना सूचना पाठविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नवीन नियमावली तयार होणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू केल्यानंतर या योजनेचा गाजावाजा झाला. मात्र, आता या योजनेने सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने निधीची जुळवाजुळव करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा अनुभव असल्याने तुकडाबंदी कायदा रद्द केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा गांंभीर्याने विचार करून नवीन नियमावली तयार करावी लागणार आहे. अन्यथा निवडणुकीतील मतांसाठी बेरजेच्या राजकारणाचा डाव टाकताना नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Sujit.tambade@expressindia.com



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!