Homeपुणे / पिंपरी-चिंचवडनाशिकमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; शिवसेना ठाकरे गटाचा महापालिकेला प्रश्न

नाशिकमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; शिवसेना ठाकरे गटाचा महापालिकेला प्रश्न


नाशिक – शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे) ‘सेल्फी विथ खड्डा’ या उपक्रमासह निषेधात्मक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. अनेक रस्त्यांची अशी अवस्था आहे की, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, हेच कळेनासे झाले असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना भेडसावणारा खड्ड्यांचा विषय राजकीय पक्षांकडून ऐरणीवर आणला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला. मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील प्रमुख व कॉलनीतील लहान-मोठ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु, काही दिवसात पुन्हा तशीच स्थिती निर्माण होत आहे.

खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाने मनपा प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील प्रमुख रस्त्याचे अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम,सातपूर, सिडको या सर्व विभागातील प्रमुख रस्त्यांसह कॉलनी रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले आहेत. काही रस्त्यांची अशी अवस्था आहे की, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच कळेेनासे झाले आहे.

हेही वाचा

खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी भरल्याने ते दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक जखमी झाले आहेत. ही परिस्थिती म्हणजे नागरिकांना आपला जीव गमावण्याच्या मार्गावर ढकलले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची अवस्था वेगळी नाही. रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून याचा निषेध करण्यासाठी सेल्फी विथ खड्डा उपक्रम सुरु करण्यात आला.

नागरिकांना आपल्या भागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढून समाजमाध्यमात प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, सर्व प्रभागातील प्रमुख रस्ते, कॉलनी रस्ते, महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, या कामासाठी कालमर्यादा निश्चित करावी, रस्त्यांची दुर्दशा होण्यास जबाबदार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, मुदतीत खड्डे बुजवले गेले नाहीत, तर ‘सेल्फी विथ खड्डा’च्या पुढील टप्प्यात मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा उपनेते दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आदींनी दिला आहे.

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

दुरुस्तीत पावसामुळे अडथळे

एरवी चकचकीत दिसणारे रस्ते पावसाळ्यात पूर्णत: बदलतात. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत मनपाच्या सर्वेक्षणात शहरात १० हजार खड्डे असल्याचे उघड झाले होते. मार्चपर्यंत ते बुजविण्याचे काम होणे अपेक्षित होते. काही प्रमाणात ते झाले. काहीअंशी बाकी राहिले. गॅस वाहिनी तसेच तत्सम कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले. त्यामुळे नव्याने खड्डेमय रस्त्यांची भर पडली. १५ मे नंतर पावसाळापूर्व रस्ते आणि खड्डे दुरुस्तीची कामे करण्याची तयारी करण्यात आली. महापालिकेने याकरिता सुमारे ९० कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याचे सांगितले जाते. परंतु, मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यामुळे डांबरीकरणातून कायमस्वरुपी रस्ता दुरुस्तीची कामे झाली नाहीत. या सर्वांचा परिणाम रस्त्यांच्या दुरावस्थेवर दिसत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसात डांबरीकरणातून रस्ता दुरुस्ती वा खड्डे बुजवण्याचे काम वेगात पुढे सरकले नाही. त्यामुळे तात्पुरत्या मलमपट्टीचा मार्ग अवलंबला गेला. या पद्धतीने बुजविलेले खड्डेही पावसात उघडे पडतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!