देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता विरोधी पक्षांनी देखील सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटकडून व मनसेकडून मोर्चा काढण्यात येत आहे. या प्रकरणावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले, जंतर मंतरवर लहान लहान मुलींचे कपडे फाडले, त्यांच्या प्रायवेट पार्टवर इजा करण्याच्या पोलिसांनी प्रयत्न केला. मुलांना बेदम मारहाण केली. हे मुलं कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हते, ते त्यांची लढाई लढण्यासाठी तिथे आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने पुढे एक पाऊल जाऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता. एक परीक्षेसाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च करावा लागतो आणि तो पेपर लीक झाला आणि त्यामुळे अनेक मुलांचे भविष्य खराब झाले आणि त्यातून अनेकांनी आत्महत्या केली. नागपूरमध्ये देखील आत्महत्या केल्या पण ते दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. हे मुलं देशाचे भविष्य आहे आणि या देशाच्या भविष्याबद्दल जो राग या मस्तावलेल्या मोदी सरकारमध्ये पाहायला मिळाला आणि त्या दृष्टीकतून चित्र आपण देशभरात पाहतो आहोत. आपण 75 वी लोकशाही साजरी करतोय. जंतर मंतरवर आपण पाहिले की या तरुणांनी राग व्यक्त केला आहे. तिथे राहुल गांधी का गेले नाही, असा प्रश्न विचारला जातोय, त्याला राजकीय रंग द्यायचा नव्हता म्हणून ते तिथे गेले नव्हते. आज देशभरात आपण शांतते आंदोलन करत आहोत. कारण आम्ही गोडसे नाही तर महात्मा गांधींच्या विचारांसोबत आहोत. आम्ही या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी कॅन्डल मार्च काढत आहोत. 56 इंच छाती कुठे गेली? पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे जर आपण 2014 च्या पूर्वीचे भाषण ऐकले तर त्यात पेपरफुटीचा सुद्धा मुद्दा होता. मग जवळपास 3 वेळचे पंतप्रधान आहात, तर सुधारणा का नाही केली? हे आंदोलन सुरू असताना लोकसभेतून पळून जातात, त्या मुलांसाठी त्या मैदानात का नाही उतरलात? 56 इंच छाती तेव्हा कुठे गेली? कायदा बदलणार आहोत असे ते व्हिडिओमधून सांगतात, लोकसभेत का नाही बोलू शकले? पळकूटा प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आहे.
Source link
’56 इंचाची छाती कुठे गेली? देशाने पळकुटा पंतप्रधान पाहिला’:नीट पेपरफुटीवरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...
वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...
कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार:तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदवावी, सहकार आयुक्तांचे स्पष्टीकरण
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने...
वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन
पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...
ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...





























