Homeपुणे / पिंपरी-चिंचवडभिवंडीतील 'मेट्रो' अपघाताची उच्च न्यायालयाकडून दखल

भिवंडीतील ‘मेट्रो’ अपघाताची उच्च न्यायालयाकडून दखल


मुंबई : दोन दिवसांपूर्वी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- ५च्या बांधकामस्थळी एक लोखंडी रॉड रिक्षावर पडून त्यातील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वतःहून दखल घेतली. तसेच, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही त्या अभावी वारंवार होणाऱ्या अशा अपघातांबाबत न्यायालयाने यावेळी नाराजी व्यक्त केली. या घटनेच्या निमित्ताने बहुमजली इमारतींच्या बांधकामस्थळांवरील सुरक्षा त्रुटींबाबत दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने यावेळी पूर्ववत केली.

वरळी येथे दोन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ५२ व्या मजल्यावरून एक मोठा सिमेंट ब्लॉक पडला होता आणि या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या अनुषंगाने मार्च २०२३ मध्ये याचिका दाखल झाली होती. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या अपघाताच्या निमित्ताने ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेण्याचे स्पष्ट केले. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, समितीच्या शिफारशी सर्व नियोजन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या नाहीत याबाबतही न्यायालयाने संताप व्यक्त केला.

मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्याचे निर्देश

या शिफारशींचा अहवाल महापालिकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या सचिवांना देण्यात आले होते. तथापि, शिफारशींची अंमलबजावणी झाली असती, तर बांधकामस्थळी असे अपघात झाले नसते, असेही न्यायालयाने ५ ऑगस्टच्या घटनेचा संदर्भ देताना दिला. यावेळी न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला समितीची मार्गदर्शक तत्त्वे पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, राज्य सरकार आणि विविध नियोजन अधिकारी त्यांची एकसमान अंमलबजावणी करू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा

महापालिकेला २०२३च्या आदेशाचा विसर

दरम्यान, न्यायालयाने ९ मार्च २०२३ च्या आपल्या आदेशाचीही यावेळी आठवण करून दिली. त्यात, बहुमजली इमारतीच्या बांधकामांसाठी वर उंचावर लटकलेल्या क्रेनमधून पडणाऱ्या वस्तूंमुळे होणाऱ्या अपघातांमध्येही निष्पाप जीव जातात हे सहन केले जाऊ शकत नाही. असे अपघात हे जगण्याच्या आणि उपजीविकेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहेत, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. या आदेशाद्वारेच नियुक्त समितीला सुरक्षा नियमांची विशेषतः बांधकाम ठिकाणी मोठ्या लटकलेल्या क्रेनच्या वापराबाबत शिफारस करण्यास सांगण्यात आले होते. समितीने वेळोवेळी बैठका घ्यायच्या होत्या आणि समितीच्या सुरक्षेबाबत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते.

भिवंडी घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदार अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च उचलण्यास आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगण्यात आल्याचेही एमएमआरडीने म्हटले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!