Homeमहाराष्ट्रराज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने कंबर कसली:मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी महत्त्वपूर्ण मागण्यांवर...

राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने कंबर कसली:मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी महत्त्वपूर्ण मागण्यांवर एकमत

राज्यात राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकामधील त्रुटींवर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत चर्चा झाली असून यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. त्यांनतर विविध मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने १९८२ च्या सेवानिवृत्ती वेतन योजनेतील सर्व सवलती आणि तरतुदींचा समावेश सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे तसेच, प्रत्येक नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निवृत्तीवेतनात अनिवार्य सुधारणा करण्याची तरतूद असावी, असेही ठरवण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी कमी भरतो, त्यांनाही १० वर्षांच्या सेवेनंतर शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन मिळावे, १० वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास किमान १०,००० रुपये किंवा प्रमाणशीर निवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून काढलेल्या आगाऊ रकमेवर १० टक्के व्याज भरण्याची अट अत्यंत जाचक असून ती रद्द करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण किंवा लग्न यांसारख्या अपरिहार्य कारणांसाठी काढलेल्या रकमेवर हे व्याज आकारू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सेवेदरम्यान अपंगत्व किंवा गंभीर आजार आल्यास १० वर्षांपेक्षा कमी सेवा असली तरी ‘अक्षम निवृत्तीवेतन लागू करावे तसेच, १० वर्षांच्या सेवेनंतर वयाची अट न ठेवता स्वेच्छानिवृत्तीची मुभा असावी आणि पुढील महिन्यापासून निवृत्तीवेतन सुरू व्हावे, अशी तरतूद सुचवण्यात आली आहे. नोव्हेंबर २००५ ते ६ मे २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचे लाभ मिळावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या सर्व कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांचा समावेश असलेले एक सविस्तर निवेदन तयार करण्यात आले असून, लवकरच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत हे मुद्दे मांडले जाणार आहेत सुधारित योजनेची अंतिम कार्यपद्धती निश्चित करण्यापूर्वी सरकारने कर्मचारी संघटनांशी सविस्तर चर्चा करावी, अशी विनंतीही महासंघाने केली आहे यावेळी महासंघाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!