Homeमहाराष्ट्रजायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांत १९६ दलघमी पाणीसाठा वाढला. रविवारी सकाळी ४८ टक्के असलेला पाणीसाठा रात्री १० वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला. सध्या जायकवाडी धरणात ११५९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, एकूण पाणीसाठा १८९७ दलघमी इतका झाला आहे. मराठवाड्यात सध्या जायकवाडी वगळता इतर कुठल्याही मोठ्या धरणात पाणीसाठा आलेला नाही, त्यामुळे या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष जायकवाडीकडे लागले आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, जायकवाडीतील वाढत्या पाणीसाठ्यामुळे कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जलतज्ज्ञ जे.एन. हिरे यांच्या मते, या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगाम यशस्वीपणे राबवता येईल. हिरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरण ५० टक्के भरल्यास किमान तीन पाणीपाळ्या देता येतील. तसेच, खरीप हंगामात पुन्हा पाऊस न झाल्यास खरिपासाठी एक पाणीपाळी द्यावी लागू शकते. या साठ्यामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची आणि औद्योगिक वापराची सोय होणार आहे. धरण १०० टक्के भरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जायकवाडीच्या वरच्या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाल्याने पुढील काही दिवसांत जायकवाडीचा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दारणा धरण ८८ टक्के, भाम, भामा-आसखेड, वालदेवी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. गंगापूर धरणात ८७ टक्के, कश्यपी ९२ टक्के, तर भंडारदरा ९० टक्के आणि निळवंडे ७९ टक्के भरले आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास जायकवाडीत आणखी पाणी येण्याची शक्यता आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा...

0
निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत...

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

0
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात 'पेट स्कॅन' चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे...

चंदीगड न्यायालयात दीपके-वांगचुक, कामरा यांच्यावर FIR ची मागणी:वकिलाची याचिका- जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनात अपमानकारक...

0
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, चंदीगडमध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...
spot_img

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...

नकारात्मक विचारांना हरवेल ‘ब्रॅग फोल्डर, येथे जमा करा यश:मेंदू पराभव लक्षात ठेवतो, विजय नाही;...

0
कधी लक्ष दिलं आहे का... फोनच्या गॅलरीमध्ये जुन्या पावत्या, निरुपयोगी स्क्रीनशॉट्स आणि अनेक वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे फोटो भरलेले असतील. पण जर तुम्हाला विचारलं की...

कंगना म्हणाली- जेन-झी आंदोलनाच्या रील्स पाहून उलटी येते:यांची कशी वाढ होत आहे; ‘कॉकरोच’सारखे वागून...

0
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर निशाणा साधला आहे. कंगनाने...
error: Content is protected !!