Homeपुणे / पिंपरी-चिंचवडनापास झाल्यामुळे पोलिसाच्या मुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

नापास झाल्यामुळे पोलिसाच्या मुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या


नागपूर : परिक्षेत नापास झाल्यानंतर शिक्षकाने गुणपत्रिका देण्यास नकार दिल्यामुळे नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने जुना ब्रिटीशकालीन पुलावरुन नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कन्हानमध्ये उघडकीस आली. आयुष सुनील फाये (१७, रा. कन्हान) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे लेखनिक म्हणून काम करणारे पोलीस हवालदार सुनील फाये यांचा लहान मुलगा आयुष (वय १७) हा केंद्रीय शाळा कामठी येथे अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत होता. मात्र, तो गणित विषयात नापास झाला होता. त्यामुळे त्याने पुन्हा परिक्षा देऊन एका विषयात उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अनुत्तीर्ण झाला होता.

सोमवारी सायंकाळी ७ वाजता घरासमोर आयूष मित्रासोबत क्रिकेट खेळला आणि आईला मित्राकडे जातो असे सांगून सायकल घेऊन निघाला. मुलगा घरी लवकर परत आला नाही. म्हणून त्याच्या मित्राकडे विचारपूस करण्यात आली. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली. शेवटी काही युवकांनी नदीकडे जाऊन बघितले असता कन्हान नदीवरील जुना ब्रिटिश काळीन पुलावर आयूषची सायकल पडलेली दिसली. त्यांनी नदीपात्रात शोध घेतला असता आयूषने पुलावरून शांती घाटाच्या जवळील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. आयूषचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.

हेही वाचा

या घटनेची माहिती मिळताच कन्हान, कामठी पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळ कामठी पोलिसांच्या हद्दीत असल्याने कामठी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ग्रामीण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला. आयूषवर कन्हान नदीच्या शांतीघाटात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कामठी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नापास झाल्यामुळे नैराश्य

आयुषला एका विषयात नापास झाला होता. तो महाविद्यालयात गुणपत्रिका आणायला गेला होता. मात्र, प्राध्यापकाने त्याला निकाल न देता पालकाला आणल्यावर निकाल मिळेल, अशी तंबी दिली होती. त्यामुळे आयुषच्या मनात भीती निर्माण झाली. आयुष घरी परत आला. भीतीपोटी त्याने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कन्हानचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली.

हेही वाचा

पाल्याचे यश फक्त गुणांच्या आकडेवारीवर मोजण्याची वृत्त पालक वर्गांत निर्माण झाली आहे. परंतू, पाल्यांना समजून घेण्याची गरज आहे. त्याची कुटुंबातील वागणूक, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव हे पालकांनी ओळखायला हवे. पाल्यांची मानसिकता पालकांनी लक्षात घ्यायला हवी. पाल्यांना प्रोत्साहन आणि भावनिक साद देण्याची गरज निर्माण झाली आहे.- प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ञ)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!