Homeमहाराष्ट्रAjit Pawar Malegaon Sugar Factory Election Win | माळेगाव निवडणुकीबाबत अजित पवारांचा...

Ajit Pawar Malegaon Sugar Factory Election Win | माळेगाव निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट: म्हणाले – मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, जुळवूनही घेणार होतो; पण विरोधकांनी प्रस्ताव नाकारला – Pune News

आपण माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जुळवून घेण्याचा विचार करत होतो, मुख्यमंत्र्यांशी माझे तसे बोलणेही सुरू होते. कारखान्याच्या 21 जागांपैकी 10 जागा आणि पहिले अडीच वर्षे चेअरमनपद, असा प्रस्ताव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला होता. मात्र,

?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने 21 जागांपैकी 20 जागांवर विजय मिळवून मोठा विजय मिळवला आहे. विजयानंतर आयोजित केलेल्या सभासद आभार मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पडद्यामागच्या राजकीय हालचालींवर भाष्य करत उपरोक्त गौप्यस्फोट केला.

नेमके काय म्हणाले अजित पवार?

मी कुणाचा कायम दुश्मन नाही, मला देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत, मग माळेगाव मध्ये का मार्ग काढत नाहीत. थोडे पुढे मागे सरका, 10/10 आणि 21 वा मी. मुख्यमंत्री म्हणाले, अडीच-अडीच वर्षे वाटून घेऊ. पण, मी काही बोललो नाही. म्हणालो, तुम्ही सांगा, मग त्यांनी चर्चा केली आणि त्यांना कुणीतरी सांगितले की हवा आपली ,असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी चंद्रराव तावरेंना लक्ष्य केले. मग सगळे इथेच फिस्कटले असा किस्सा अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान घडल्याची माहिती विजयी सभेत दिली.

मी 1991 साली कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभा होतो, त्यानंतर मी 95, 99 ला स्वतः मतमोजणीला उपस्थिती होतो. आपले उमेदवार मतमोजणी ला कुठे होते? उमेदवार होते कुठे? असे कसे तुम्ही करू शकता? हे बरोबर नाही, असे म्हणत अजित पवारांनी उमेदवारांवरही आपला संताप बोलून दाखवला.

विरोधकांच्या डोक्यातील हवा सभासदांनी उतरवली

मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावामुळे विरोधकांना माळेगावच्या चेअरमनपदाची संधी आली होती. माळेगाव कारखान्याबाबत ‘छत्रपती’ प्रमाणे तडजोडीतून मार्ग काढावा, असा आग्रह देवेंद्र फडणवीसांचा होता. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी तसे प्रयत्नही केले. मात्र, विरोधकांच्या डोक्यात वेगळीच हवा होती, सभासदांनी नेमकी तीच हवा एका दणक्यात उतरवली, असा टोलाही अजित पवारांनी चंद्रकांत तावरेंना नाव न घेता लगावला.

…त्यामुळे तुतारीवाल्यांसोबतची बोलणी फिस्कटली

अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात मला तुतारीवाल्यांचे बारामती तालुकाध्यक्षही भेटले. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लोकांची यादी मला दिली आणि सांगितले,‘हे आमचे उमेदवार आहेत, यातील तीन उमेदवार घ्या’. त्यांचा मी आदर केला, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा फोन केला आणि ‘गणपत देवकाते ॲड. राजेंद्र काटे यांच्या नावासाठी आग्रह धरला. मला ते आवडले नाही. त्यामुळे तुतारीवाल्यांच्या पक्षाबरोबर झालेली बोलणी फिस्कटली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!