Homeमहाराष्ट्रCM Devendra Fadnavis Phone Call and Letter to Vaibhavi Deshmukh To Congratulate...

CM Devendra Fadnavis Phone Call and Letter to Vaibhavi Deshmukh To Congratulate on Her 12 th Exam Result | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वैभवी देशमुखला फोन: पत्रही पाठवले, बारावीच्या परीक्षेतील यशाबद्दल केले अभिनंदन – Mumbai News


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दोन महिन्यांत त्यांची कन्या वैभवी देशमुख हिने दुःखाचा डोंगर पेलत बारावीची परीक्षा दिली. आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वैभवीने ब

?

मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हटले?

अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणिव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय. 85.33 टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल. भावी वाटचालीसाठी तुला अनेकानेक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत वैभवी देशमुख हिचे अभिनंदन केले आहे. प्रचंड कटूतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले असले तरीसुद्धा इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचा गोडवा तू जतन करशील, अशा शब्दांत अंधारे यांनी वैभवीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुषमा अंधारे यांची पोस्ट

प्रचंड संतुलित वातावरणामध्ये उत्कृष्ट आणि अतिउच्च प्रतीची खते वापरून प्रत्येक क्षण निगराणी करत जर एखाद्या कुंडीमध्ये गुलाबाचे टपोरे फुल फुलले तर त्याचे फारसे कौतुक वाटत नाही. मात्र ऊन वाऱ्याचा मारा सोसत, मातीतून अंकुरून वर येण्यासाठी आपल्याला कुठलाही आधार असणार नाही याची जाणीव असतानाही टरारून कोंभ जिद्दीने वर येतो तेव्हा खडकाळ माळरानावर उगवलेल्या साध्या गवताच्या पात्यावरही प्रेम करावसं वाटतं…

खरंतर 16 व 17 व वर्ष म्हणजे आयुष्याला आकार देणारे वर्ष. या वळणावर वळण सकारात्मक मिळालं तर आयुष्य वळणदार होतो वळण चुकलं तर मात्र आयुष्याचा वाळवण व्हायला वेळ लागत नाही… कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी आपला विवेक हरवता कामा नये. चांगुलपणावर असणारी निष्ठा आणि सात्विक मूल्य आपण जपली पाहिजे. हा संस्कार मागील सहा महिन्यांपासून ज्या वैभवीच्या ठाई आपण सगळ्यांनी बघितला. तिचा बारावीचा निकाल कौतुकास्पद आहे ..!

एकीकडे वडिलांची अत्यंत क्रूर हत्या.. दहशत.. राज्यभरातले आक्रोश मोर्चे जर आपल्या वडिलांसाठी निघत असतील तर आपण स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे याचं आत्मभान आणि त्याच वेळेला वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची जाण जपत वैभवीने बारावीची परीक्षा दिली. तिचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला लागला.

वैभवी खूप खूप अभिनंदन शुभेच्छा… मला खात्री आहे आयुष्यातल्या कुठल्याही कठीण प्रसंगांमध्ये तुझा विवेक हरवणार नाही… प्रचंड कटूतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले असले तरीसुद्धा इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचा गोडवा तू जतन करशील… खूप खूप अभिनंदन…उंच उंच झेप घे.. तुझ्या झेपेच्या कवेत आकाश आहे… ! अशी पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...
spot_img

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!