Homeमनोरंजनआयपीएल २०२25 वैध सूर्यावन्शी जीटी विरुद्ध शतकासह वीरेंद्र सेहवागला उत्तर द्या

आयपीएल २०२25 वैध सूर्यावन्शी जीटी विरुद्ध शतकासह वीरेंद्र सेहवागला उत्तर द्या


आयपीएल 2025: आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर सर्वांचं लक्ष राजस्थान रॉयल्स संघात असणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे होतं. 1 कोटीत खरेदी केलेला वैभव खरंच वेगवान आणि त्यातही जगातील सर्वोत्तम गोलंदाजांसमोर टिकेल का अशी शंका अनेकांच्या मनात होती. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार लगावत वैभवने आपण किती उत्कृष्ट फलंदाज आहोत याची झलक दाखवली. यानंतर गुजरातविरोधातील सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकत त्याने त्याच्याबाबत सुरु असलेल्या सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे. वैभव सूर्यवंशीने फक्त 100 तासात भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागलाही उत्तर दिलं आहे. सेहवागने मी अनेक खेळाडूंना एक, दोन सामन्यानंतर गायब होताना पाहिलं आहे असं म्हटलं होतं.

IPL 2025: ‘नशिबाने त्याला…’, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शतकावर शुभमन गिलची प्रतिक्रिया वादात; जडेजा म्हणाला ‘नुसतं टीव्हीवर…’

गुजरातविरोधातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने 38 चेंडूत 101 धावा करत तुफानी खेळी केली. अनेकांनी आपण अशी खेळी कधीच पाहिलं नसल्याचंही म्हटलं. एक 14 वर्षांचा मुलगा इतक्या निर्भीडपणे समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला टोलेगंज षटकार लगावतो हे पाहणं तसं दुर्मिळच आहे.

सेहवागने वैभवबद्दल काय म्हटलं होतं?

आता वीरेंद्र सेहवाग वैभव सूर्यवंशीबद्दल काय म्हणाला होता हे जाणून घ्या. सेहवागने जे सांगितले ते वैभवच्या शतकाच्या 96 तास आधी म्हणजे 4 दिवस आधीचे होते. 24 एप्रिल रोजी राजस्थान आणि आरसीबी विरुद्ध सामना होता. या सामन्यात वैभव सूर्यवंशी लवकर आऊट झाला होता. त्यानंतर सेहवाग म्हणाला होता की, जर तो या आयपीएलमध्ये खूश असेल आणि आता तो करोडपती आहे असं त्याला वाटत असेल, त्याचे पदार्पण उत्तम झाले असेल, त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला असेल, तर कदाचित तो पुढच्या वर्षी खेळताना दिसणार नाही.

IPL 2025: शतक ठोकल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या पोस्टला 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने दिलं उत्तर; पण X ने सस्पेंड केलं अकाऊंट, कारण…

सेहवाग पुढे म्हणाला होता की, “मी अनेक खेळाडूंना येताना जाताना पाहिलं आहे, जे एक दोन सामन्यांमुळे प्रसिद्ध होतात. पण नंतर ते काहीच करत नाहीत कारण त्यांना वाटतं की आपण स्टार झालो आहोत”. पण आता वैभवने सेहवागला गुजरातविरोधात शतक ठोकत त्याच्याच स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, ज्या फलंदाजीतील अपयशामुळे सेहवागला बोलण्याची संधी मिळाली होती त्याच फलंदाजीने वैभव सूर्यवंशीने त्याचं उत्तर दिलं. सचिन तेंडुलकरची टीकाकारांना उत्तर देण्याची हीच शैली होती. हे एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे. वैभव सूर्यवंशीने त्याच्या झंझावाती शतकाने सेहवागला आपली स्वपं, आकांक्षा लहान नसल्याचं दाखवून दिलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!