Homeमनोरंजनआयपीएल २०२25 या हंगामात त्याच्या खराब धावण्यावर iplab षभ पंत शांततेत मुंबई...

आयपीएल २०२25 या हंगामात त्याच्या खराब धावण्यावर iplab षभ पंत शांततेत मुंबई इंडियन्सविरूद्ध हरवलेल्या प्रत्येक पोस्टच्या प्रत्येक वेळी एका व्यक्तीला त्रास देण्याविषयी बोलले.


IPL 2025 मध्ये षभ पंत त्याच्या गरीब फॉर्मला अपमानित करते: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वापूर्वी झालेल्या महालिलावामध्ये लखनऊ सुपर जांयट्सच्या संघाने तब्बल 27 कोटी रुपये मोजून ऋषभ पंतला संघात सहभागी करुन घेत त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. मात्र यंदाच्या पर्वातील अर्ध्याहून अधिक सामने संपले असून पंतला आपल्या कामगिरीचा प्रभाव पाडता आलेला नाही. ऋषभ पंत फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणूनही या स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला आतापर्यंत या स्पर्धेत फलंदाजीने छाप पाडता आलेली नाही. मुंबईविरुद्ध रविवारी वानखेडेच्या मैदानात झालेल्या सामन्यामध्येही पंत अपयशी ठरला. दुसऱ्याच चेंडूवर पंत करण शर्माला झेल देऊन तंबूत परतला.

10 सामन्यामध्ये 110 धावा

पंतला यंदाच्या पर्वामध्ये 10 सामन्यामध्ये केवळ 110 धावा करता आल्या आहेत. त्याने 12.22 च्या सरासरीने 98.21 च्या स्ट्राइक रेटने 110 धावा केल्यात. त्याने 10 सामन्यामध्ये 0,15,2,2,21,63,3,0 आणि 4 धावा केल्यात.

पंतला सुमार कामगिरीबद्दल विचारलं

मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर पंतला या पर्वातील त्याच्या सुमार कामगिरीबद्दल विचारण्यात आलं असता त्याने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली. संघाच्या कामगिरीसाठी एकाच व्यक्तीला लक्ष्य करणं योग्य नसल्याचं पंतने म्हटलं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याची आठवणही त्याने करुन दिली आहे.

नक्की वाचा >> भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास सचिन, धोनीला बॉर्डवर जावं लागणार का? जाणून घ्या सविस्तर

मी असा विचार करतो की…

“मी फार सरळ मार्गाने विचार करतो जास्त विचार करायला मला आवडत नाही. सध्या सुरु असलेल्या पर्वात अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. अळा वेळी तुम्ही स्वत:ला एक खेळाडू म्हणून प्रश्न विचारु लागता आणि स्वत:वर शंका घेऊ लागता. मात्र हे असं होता कामा नये. एकंदरित संघ चांगली कामगिरी करत असेल तर तुम्ही त्याचा आधी विचार केला पाहिजे,” असं पंत मुंबईविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर म्हणाला.

नक्की वाचा >> सचिन, विराट, रोहितपेक्षा आठवीतलं पोरगं सरस! Vaibhav Suryavanshi ने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच

एकालाच टार्गेट करणार असाल तर..

“हा सांघिक खेळ आहे. एका खेळाडूमुळे नक्कीच सामन्यावर प्रभाव पडतो. मात्र दरवेळी तुम्ही एकाच खेळाडूला लक्ष्य करणार असाल तर माझ्या मते ही योग्य गोष्ट नाही,” असं पंतने मुंबईविरुद्धचा सामना गमावल्यानंतर म्हटलं आहे.

पंतचा तो फटका पाहून कॉमेंटेटर्स थक्क

पंत मुंबई विरुद्धच्या सामन्यात रिव्हर्स स्वीप खेळताना झेलबाद झाल्याचं पाहून कॉमेंट्री करणारा माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉट्सन आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू डॅनी मॉरिसन यांनाही पंतने अशा फटका का निवडला याबद्दल आश्चर्य वाटलं. आपल्या खेळीतील दुसऱ्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करताना पंत झेलबाद झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!