Homeदेश-विदेश'पाणी थांबवाल? ते तसंही येत नाही...', सिंधू पाणी करारावर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया

‘पाणी थांबवाल? ते तसंही येत नाही…’, सिंधू पाणी करारावर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया


भारत पाकिस्तान तणाव: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचे प्राण गेले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला 1960 चा सिंधू पाणी करार महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. भारताकडून हा करार स्थगित करण्यात आला.पहलगाम हल्ल्याबद्दल भारतात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी सरकारने अनेक कठोर पावले उचलली आहेत.

पहलगामच्या बैसरन मैदानात घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. ज्यात 2 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तैयबा’ (एलईटी) चा सहयोगी असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ने केल्याचे तपासात समोर आले आहे.

हल्ल्यानंतर भारत सरकारने आणखी एक कठोर पाऊल उचलले आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच इतर अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानने 1972 चा सिमला करारही स्थगित करण्याची घोषणा केली. या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी नेटिझन्सच्या मनोरंजक प्रतिक्रिया

भारताने सिंधू पाणी करार रद्द करताच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा झाली. पाकिस्तानी नेटिझन्सनी यावर काही मनोरंजक आणि टीकात्मक रिअॅक्शन दिल्या. भारताने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे ‘धमकी’ दिल्या तरी पाकिस्तान आधीच पाणी टंचाई सारख्या अनेक संकटांना तोंड देतंय, असे पाकिस्तानी नेटिझन्स म्हणतायत.

सोशल मीडियात पोस्ट व्हायरल

एका पाकिस्तानी नेटिझन्सने पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारत आम्हाला धमकावण्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही आधीच आमच्या सरकारच्या हातून त्रास सहन करत आहोत. तुम्ही पाणी थांबवाल का? ते असेही येत नाही. तुम्ही आम्हाला माराल का? आमचे सरकार आधीच आम्हाला मारतंय. तुम्ही लाहोर ताब्यात घ्याल का? तुम्ही अर्ध्या तासानंतर ते स्वतः परत आणाल. ही पोस्ट X (पूर्वीचे ट्विटर) वर ‘Pvt_insaann’ या हँडलवरून शेअर करण्यात आली आणि त्याला 126000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

महाराष्ट्रात ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा

0
"मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे." या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

पाकिस्तानचे कार्गो विमान कराचीजवळ बेपत्ता; अरबी समुद्रात शोध सुरू आहे

0
कराची7 तासांपूर्वीलिंक कॉपी करापाकिस्तानचे एक मालवाहू विमान मंगळवारी रात्री कराचीला पोहोचण्यापूर्वी बेपत्ता झाले. हे विमान शारजाहहून कराचीला येत होते. त्यात 5 क्रू सदस्य...
spot_img

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...

0
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...

वेस्ट इंडीजने मालिका जिंकली:श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ड्रॉ, 4 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका...

0
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात नॉर्थ साउंड येथे खेळला गेलेला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासोबतच वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी...
error: Content is protected !!